-
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले आहेत, यावेळी कर्जत जमखेड मतदारसंघात अंदर रोहित पवारांना निसटता विजय मिळाला.
-
भाजपाचे राम शिंदे हे महायुतीचे उमेदवार येथे पराभूत झाले आहेत.
-
राम शिंदे हे केवळ १२४३ मतांनी पराभूत झाले तर तितक्याच मतांनी रोहित पवार विजयी झाले.
-
दरम्यान हा निकाल मला मान्य नसल्याचे राम शिंदे यांनी याधीच सांगितले आहे. त्यावर आज त्यांनी आणखी वेगळी भूमिका मांडली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
-
त्यांनी स्वतःच्या पराभवाला अजित पवारांना जबाबदार धरले आहे. अजित पवारआणि केलेल्या वक्तव्याचा हवाला दिला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
कराडमध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांशी संवाद साधला, ते म्हणाले, “शहाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झाले असते.?” -
यावरूनच आता, पराभव हा सुनियोजित कट आहे, त्यात माझा बळी गेला, यामध्ये अजित पवार देखील सहभागी असावेत, अशी शंका कर्जत-जामखेडचे भाजपाचे पराभूत उमेदवार राम शिंदेंनी व्यक्त केली.
-
राम शिंदे म्हणाले..
राम शिंदे म्हणाले, “याबाबत मी जाहीरपणे बोलणार नव्हतो, पण अजितदादा बोलत असतील तर मी देखील बोलणार, वरिष्ठांकडे मी याबाबत निवडणूक काळातच तक्रार केली,” असेही राम शिंदेंनी सांगितले -
कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना १ लाख २७ हजार ६७६ मते मिळाली आहेत.
-
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात ३० कोटी रुपये वाटले, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला. “भाजपाने सर्व शक्ती आणि गुंड वापरुन देखील माझा विजय झाला, मी निवडून आलो तरी आमचे अनेक मोठे नेते पडले, याचे दुःख आहे. कमी लीडने का होईना, पण मी निवडून आलो, त्यामुळे विधानसभेत मतदारसंघासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी अधिक आक्रमकपणे आवाज उठवणार,” असेही रोहित पवार म्हणाले.
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा – महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे लाडकी बहीण योजनेवर म्हणाले, “ठरल्याप्रमाणे….”

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस