-
भारतीय कसोटी संघाचा कप्तान विराट कोहली मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर फलंदाजीचा सराव करत आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली दीर्घ रजेवर गेला होता. तो न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतही खेळला नाही.
-
सध्या कानपूर येथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत तो खेळत नसला, तरी मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विराट संघात परतणार आहे.
-
यासाठी विराट जोरदार सराव करत आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर विराट दिग्गज प्रशिक्षक संजय बांगर यांच्याकडून बॅटिंग टिप्स घेत आहे.
-
विराट कोहलीने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक केले. त्यानंतर कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीत त्याने शतक झळकावले.
-
तेव्हापासून त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) त्याला शतक झळकावता आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध शतकाचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट प्रयत्न करणार आहे. (सर्व फोटो ट्विटर आणि सोशल मीडियावरून साभार)

चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..