-
काल ६ जून २०२५ रोजी जगातल्या सर्वात उंच पुलाचे उद्धाटन झाले आहे. (Photo: Narendra Modi/X)
-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. (Photo: Narendra Modi/X)
-
हा पूल १३१५ फूट लांबीचा आहे आणि १४८६ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा पूल ताशी २६६ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्येदेखील अजिबात डगमगणार नाही अशी त्याची क्षमता आहे. भारतातील अशाच इतर पुलांबद्दल जाणून घेऊयात…(Photo: PTI)
-
१. वांद्रे वरळी सी लिंक ब्रिज
हा पूल ५.६ किमी लांबीचा आहे. यामुळे वांद्रे ते वरळी हा प्रवास फक्त १० मिनिटांत पूर्ण होतो, तर पूर्वी हे अंतर कापण्यासाठी एक तास लागत असे. या पुलाची खास गोष्ट म्हणजे या पुलाच्या निर्मितीत वापरल्या गेलेल्या स्टील केबल्सची लांबी एकत्र जोडल्यास पृथ्वीच्या परिघाएवढी असेल असे म्हटले जाते. १६०० कोटी रुपये खर्चून हा पूल उभारण्यात आला आहे. (Photo: Indian Express) -
२. पंबन पूल
रामेश्वरमला सहज पोहोचता यावे यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे. पूर्वी येथे एक जुना पूल होता, परंतु कालांतराने येथे एक नवीन पूल बांधण्यात आला आहे. पंबन पूल हा भारतातील पहिला उभा पूल आहे. त्यात असे सेन्सर बसवण्यात आले आहेत की जर येथे वाऱ्याचा वेग ५० पेक्षा जास्त असेल तर सिग्नल आपोआप लाल होतो आणि प्रवासी गाड्या थांबवू शकतात. (Photo: Social Media) -
३. बोगीबील पूल
ब्रह्मपुत्र नदीवर बनवण्यात आलेल्या या पूलावरून गाड्या आणि रेल्वेही जाते. हा पूल पूर्णपणे वेल्डेड स्टील-काँक्रीट सपोर्ट बीमसाठी ओळखला जातो. (Photo: Social Media) -
बोगीबील पूल हा ईशान्य भारतातील आसाम राज्यातील धेमाजी जिल्हा आणि दिब्रुगड जिल्ह्यादरम्यान ब्रह्मपुत्र नदीवर बांधलेला आहे. (Photo: Indian Express)
-
४. हावडा ब्रिज
हा पूल कोणाला माहित नाही? हावडाला कोलकात्याचे वैभव म्हटले जाते. हुगली नदीवर बांधलेल्या या पुलाचे खरे नाव रवींद्र सेतू आहे. ब्रिटिशांनी १९३६ मध्ये त्याला बांधण्यास सुरुवात केली आणि १९४२ मध्ये तो पूर्ण झाला. या पुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात एकही नट बोल्ट वापरण्यात आलेला नाही. हा पूल नदीच्या दोन्ही बाजूंना बांधलेल्या २८० फूट उंच दोन खांबांवर उभा आहे. (Photo: Social Media) -
५. रामझुला
जर तुमच्यापैकी कोणी ऋषिकेशला गेला असाल तर या पूलाबद्दल तुम्हाला माहिती असेलच. राम झुला हा पूल ऋषिकेशचे मुख्य आकर्षण आहे. त्याचे बांधकाम ७ मार्च १९८५ रोजी सुरू झाले आणि ५ एप्रिल १९८६ रोजी पूर्ण झाले. त्याची लांबी २२०.४ मीटर आणि रुंदी दोन मीटर आहे. या पुलाचे टॉवर २१ मीटर उंच आहे, जे ४४ मिमी व्यासाच्या २४ दोऱ्यांवर आधारलेले आहे. (Photo: Social Media)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल