‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणुकीतील अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. ते आप मधील प्रमुख चेहर्यांपैकी एक आहेत.
मायावतींनी आपल्या भाषणात अलीवर पक्ष आणि अमरोहाच्या लोकांशी विश्वासघात केल्याचा आरोप केला, त्यांची हकालपट्टी केल्यानंतर मायावती पहिल्यांदा या विषयावर उघडपणे बोलल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील भाजपाचे उमेदवार विश्वदीप सिंह हे त्यांच्या वयाच्या वादावरून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात वय वेगळे असल्याचा आक्षेप ‘सपा’ने घेतला आहे.
ग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांनी ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात ‘इंडियन एक्सप्रेस’बरोबर बोलताना अनेक विषयांवर रोखठोक भूमिका मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केले होते. काँग्रेस पक्ष जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता टीका होत आहे.
पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? याबद्दल मतदार साशंक दिसले. अनेक मतदारांमध्ये असंतोषाची भावनाही दिसून आली. दलित समुदायामध्ये संविधान बदलाची भीती असल्याचेही पाहायला मिळाले.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली.
राज्यघटना बदलली पाहिजे, अशी इच्छा बाळगणाऱ्या लोकांच्या हाती सत्ता आली तर, देशाची संसदीय लोकशाही अस्ताला जाईल, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची अमरावतीत जाहीर सभा पार पडली. या सेभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर टीका करताना थापाड्यांची आणि खोटारड्यांची लंका जाळण्यासाठी येथे आलो आहोत, असा निशाणा साधला.