भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.
भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, विद्यामान सरकारी वैद्याकीय महाविद्यालयांच्या अपग्रेडेशनसाठी ५,०२३ एमबीबीएस जागा वाढवण्यासाठी केंद्रीय योजनेचा विस्तार करण्यासही मंजुरी…
भारतात अमेरिकतील ॲपल कंपनीच्या आयफोन-१७ चे जल्लोषात स्वागत होत आहे. अनेक शहरांमध्ये आयफोनच्या खरेदीसाठी ॲपलच्या दालनांसमोर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र…