लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद (Aurangabad) विभागातील एक जिल्हा आहे. लातूर (Latur)हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. लातूर जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो.
१९ व्या शतकात लातूर हैदराबाद संस्थानमध्ये आला. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. नंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. सध्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.Read More
शतकोत्तर वाटचाल करणारे नाशिककरांचा मानाचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेले रविवार कारंजा गणेश उत्सव मंडळ सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ओळखले…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षाच्या अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथे झालेल्या तीन जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी…
मुंबईत ये-जा करण्याचा प्रवास कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांना वंदे भारत मुंबईशी जोडली जात…
राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत यंदाही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून राज्यातील पहिल्या वैद्यकीय प्रवेश यादीत सर्वाधिक १२०३ विद्यार्थी लातूर जिल्ह्यातून…