लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद (Aurangabad) विभागातील एक जिल्हा आहे. लातूर (Latur)हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. लातूर जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो.
१९ व्या शतकात लातूर हैदराबाद संस्थानमध्ये आला. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. नंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. सध्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.Read More
आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये, मृतांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठ्या खोट्या असून, या प्रकरणी नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…
लातूर जिल्ह्यात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले.मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील अनेक रस्ते,…
जिल्हा सहकारी बँकांमधील नोकरभरती गुणवत्तेच्या आधारे तसेच पारदर्शीपणे व्हावी, यासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी सुस्पष्ट आदेश जारी केले होते. त्यानुसार सरळसेवा…
निलंगा तालुक्यातील कलांडी, डांगेवाडी, निटूर आदी गावांमधील भूगर्भातून २९ सप्टेंबर रोजी रात्री नऊपासून आवाज येण्यास सुरुवात झाली. ३० सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत…
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने कहर केल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानांना नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पाठविण्यात आले आहे.