१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.
सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.Read More
हार्बर मार्गावरील वाशी येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली) सुरू करण्याच्या कामासाठी बुधवारी रात्रीपासून शनिवारी रात्रीपर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार…
भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार सुरू असल्याची माहिती लोढा…
Mumbai Western Railway Passenger Brakes TC Office: पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकातील तिकीट तपासणी कार्यालयातील मालमत्तेचे विनातिकीट प्रवाशाने नुकसान केले. मॉनिटर,…