Maharashtra News Today, 02 November 2023 : सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठा आरक्षणाबाबत पेच कायम आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करूनच न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा ठराव करीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन बुधवारी केले. मात्र, मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची आक्रमक भूमिका जरांगे यांनी जाहीर केली. यासह विविध राजकीय, क्राइम घडामोडी जाणून घेणार आहोत…
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…
विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी महापारेषणच्या कार्यालय सभागृहात बैठक पार पडली.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल याबाबतची ही रंगीत तालीम असणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि एकदिवशीय अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत आहेत. आमदारांनी चक्काजाम केला आहे. यानंतर पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतलं आहे.
जायकवाडीला पाणी सोडण्याची तयारी प्रगतीपथावर असली तरी काही धरणांची संयुक्त पाहणी बाकी आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित पथकाच्या देखरेखीत जायकवाडीसाठी पाणी सोडता येईल.
अमेय प्रभू यांच्या नियुक्तीचे वृत्त सर्वप्रथम त्यांचे वडील, माजी केंद्रीय रेल्वे आणि ऊर्जा मंत्री सुरेश प्रभू यांनी समाजमाध्यमात टिप्पणीद्वारे दिले.
सध्या कोणतेही अर्ज प्रलंबित नाहीत. केवळ हैदराबादमधील एका कंपनीचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.
हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या चर्चेत सत्यता नसून उलट देशातील सर्वात मोठे एकात्मिक ज्वेलरी पार्क नवी मुंबईत उभे राहत असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याबरोबर शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही स्वच्छतागृह तुंबली असल्याने तेथील निचरा फलाटावर होत आहे.
अवघी नदी फेसाळलेल्या स्वरूपात दिसत आहे. ही पवना नदी नव्हे तर हिमालयातील बर्फाळ नदी असल्याचा भास काही क्षण होतो.
राजकीय विरोधकांवर पाळत ठेवणे, त्यांचे फोन चोरून ऐकणे हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा आवडता छंद आहे. महाराष्ट्राचे फडणवीस सरकारही याला अपवाद नव्हते. त्यात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘अॅपल’ कंपनीने दिलेल्या फोन हॅकिंगच्या इशाऱ्याची भर पडली आहे. नेहमीप्रमाणे सरकारने फोन हॅकिंगचे आरोप फेटाळले आहेत. मात्र, त्याच वेळी चौकशी करण्याचे आश्वासनही दिले आहे. म्हणजे एकीकडे फोन टॅपिंग वगैरे काहीही नाही असा ‘आव’ आणायचा आणि दुसरीकडे चौकशीचा फार्स करून आपण ‘साव’ असल्याचा देखावा करायचा, अशी टीका शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका केली आहे.
मनोज जरांगे-पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला यावे, मराठा त्यांना संरक्षण देतील, असं म्हणाले होते. पण, आज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी कोणताही राजकीय नेता नाही तर सरकारचे शिष्टमंडळ जाणार आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नसल्याचा निर्धार बुधवारी व्यक्त केला होता.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे लागू करण्यात आलेली धाराशिव, बीड येथील संचारबंदी बुधवारी उठविण्यात आली. मात्र, भय आणि अफवांमुळे बाजारपेठा बंद होत्या. मंगळवारी उशिरा रात्री पाटोदा तालुक्यातील पुसळंब येथे अज्ञातांनी पोलीस चौकी पेटवून दिली. तर पूर्णा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीलाही आग लावण्याचा प्रयत्न झाला. हिंगोली येथे नव्याने दोन जणांच्या आत्महत्या आरक्षणाच्या मागणीसाठी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील जाळपोळ आणि हिंसाचारातील घटनांमध्ये ९९ जणांना, नांदेडमध्ये ५० जणांना तर धाराशिवमध्येही हिंसक आंदोलकांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.