-
चाहत खन्ना ते सारा खान आणि करण ग्रोवरपर्यंत असे अनेक टीव्ही सेलिब्रिटी आहेत जे लग्नाच्या काही महिन्यांनंतर आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले. काहींचा लग्नाच्या सहा महिन्यात तर काहींचा दोन वर्षांमध्ये घटस्फोट झाला. पाहुयात काही जोड्या…
-
‘सपना बाबुल का… बिदाई’मध्ये साधना लेख राजवंशची भूमिका साकारणारी सारा खान बिग बॉसच्या घरात अली मर्चंटच्या प्रेमात पडली होती. २०१० मध्ये दोघांनी तिथेच घाईगडबडीत लग्न केले, मात्र सहा महिन्यात दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले.
-
पुलकित सम्राटने २०१४ मध्ये श्वेता रोहिरासोबत लग्न केले. पण त्यांचे लग्नही फार काळ टिकले नाही आणि लग्नाच्या ११ महिन्यांनंतर त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला.
-
मंदाना करीमीने २०१७ मध्ये बिझनेसमन गौरव गुप्तासोबत लग्न केले पण ६ महिन्यांनंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.
-
करण सिंग ग्रोव्हरने अभिनेत्री जेनिफर विंगेटशी लग्न केले. २०१२ मध्ये दोघांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले होते, परंतु लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले.
-
‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या चाहत खन्ना यांनी २००६ मध्ये बिझनेसमन भरत नरसिंघानीसोबत लग्न केले, पण लग्नाच्या ९ महिन्यांनंतर त्यांचे नाते तुटले.
-
करण सिंग ग्रोवरने २००८ मध्ये अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत पहिले लग्न केले, पण लग्नाच्या १० महिन्यांनंतर त्यांचा घटस्फोट झाला.
-
‘उत्तरन’ फेम रश्मी देसाई आणि नंदिश संधू यांनी २०१२ मध्ये लग्न केले, पण लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना दु:ख झाले आणि ते वेगळे राहू लागले. दोघांनीही आपलं लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला आणि २०१५ मध्ये पुन्हा एकत्र राहायला सुरुवात केली, पण अखेर २०१६ साली दोघेही वेगळे झाले.
-
अभिनेता समीर सोनीचं पहिलं लग्न मॉडेल राजलक्ष्मी रॉयसोबत झालं होतं. परंतु लग्नाच्या सहा महिन्यांतच ते वेगळे झाले. त्यानंतर समीरने अभिनेत्री नीलमशी लग्न केले आणि दोघांनी २०१३ मध्ये एक मुलगी दत्तक घेतली. (फोटोः सोशल मीडिया)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक