-  
  छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.
 -  
  या कार्यक्रमातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.
 -  
  त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.
 -  
  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली.
 -  
  शिवाली परबने नुकतंच ‘सकाळ पॉडकास्ट’ला मुलाखत दिली.
 -  
  या मुलाखतीत तिने तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात कशी संधी मिळाली? याबद्दल भाष्य केले.
 -  
  “माझ्या घरात सिनेसृष्टीशी संबंधित कोणीही नव्हते.”
 -  
  “मी सुरुवातीला एकांकिका, नाटक या क्षेत्रात काम करायचे.”
 -  
  “त्यानंतर मग मी जोगेश्वरीमधील एक ग्रुप जॉईन केला.”
 -  
  “त्यांनी बदलापूरला ‘आगरी महोत्सव’ म्हणून एक कार्यक्रम घेतला होता.”
 -  
  “त्यात मी असिस्टंट म्हणून काम करत होते.”
 -  
  “यावेळी नम्रता ताई आणि अरुण काका हे दोघेही त्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते.”
 -  
  “तिथे आगरी महोत्सव असल्याने आगरी भाषेत बोलायचं होतं. पण तिथे मुलांना ती भाषा येत नव्हती.”
 -  
  “मला ती भाषा येत होती. तेव्हा नम्रता ताईने आपण हिलाही यात घेऊ या, हिला आगरी बोलता येतंय, असं सांगितलं.”
 -  
  “मी त्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि हा संपूर्ण कार्यक्रम केला.”
 -  
  “नम्रता ताईला हे सर्व खूप आवडलं.”
 -  
  “माझा परफॉर्मन्स बघितल्यानंतर नम्रता ताई आणि तिचे पती योगेश दादा यांना तो आवडला.”
 -  
  “त्यांनी माझे कौतुक केले. त्याबरोबरच त्या दोघांनी मला व्हॅनिटीमध्ये बोलवलं.”
 -  
  “त्यावेळी त्यांनी मला आमच्याकडून तुला एक काम नक्की देऊ, असे सांगितलं.”
 -  
  “मी माझ्याकडून तुला नक्की एक काम देईन, असे नम्रता संभेराव ताईने सांगितलं.”
 -  
  “त्यानंतर एक दिवस मला फोन आला. तो फोन हास्यजत्रेच्या ऑडिशनचा होता.”
 -  
  “त्यावेळी त्या फोनवर त्यांनी नम्रता संभेरावने तुमचा रेफरन्स दिला आहे, असे सांगितले.”
 -  
  “तेव्हा मला खूपच भारी वाटलं होतं. त्यामुळे मला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही संधी नम्रता ताईमुळे मिळाली.”
 -  
  “मी कायमच तिचं नाव सांगत असते आणि तिचे आभार मानते”, असे शिवालीने सांगितले.
 
  “सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…