-
दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेलची ‘ये है महोब्बते’ मालिका प्रचंड गाजली.
-
मात्र, पाकिस्तान सरकारला या मालिकेची थीम फारशी आवडली नाही त्यामुळे तिथे या मालिकेवर बंदी घालण्यात आली.
-
‘भाबीजी घर पर हैं’ ही विनोदी मालिकेला भारतीय प्रेक्षकांना भारतीय प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.
-
मात्र, ही मालिका चुकीचा संदेश देते असे म्हणत पाकिस्तान सरकारने आपल्या देशात या मालिकेवर बंदी घातली आहे.
-
सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे पण पाकिस्तानमध्येही त्यावर बंदी आहे.
-
सुरुवातीला हा शो पाकिस्तानी प्रेक्षकांना आवडला होता आणि ९ व्या सीझनपर्यंत तो पाकिस्तानमध्ये प्रसारित झाला होता,
-
परंतु जेव्हा शोमध्ये शिवीगाळ आणि मारामारीसारख्या घटना घडू लागल्या तेव्हा पाकिस्तानमध्ये या शोवर बंदी घालण्यात आली.
-
भारतातमध्ये ‘नागीण’ मालिका प्रचंड गाजली. पाकिस्तानमध्येही या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
-
मात्र, या मालिकेचा पहिला सीझनच पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यात आला. दुसऱ्या सीझनच्या अगोदर या मालिकेवर बंदी घालण्यात आली होती.
-
करण सिंग ग्रोवर आणि सुरभी ज्योतीची ‘कबूल है’ मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. मुस्लिम कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवून ही मालिका बनवण्यात आली होती. मात्र, तरीही पाकिस्तानमध्ये त्यावर बंदी होती.
-
पाकिस्तानमध्ये या मालिकेवर बंदी का घालण्यात आली याची नेमकी माहिती मिळालेली नाही,
-
मात्र या मालिकेत भारतीय मुस्लिम कुटुंब दाखवले जात असल्याने पाकिस्तान सरकारने यावर बंदी घातली असल्याची चर्चा सुरु होती.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा