-
स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग-ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.
-
खरतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला.
-
मात्र सौमित्रने अवंतिकाबरोबरच लग्न करण्याचं ठरवत ऐन लग्नाच्या धामधूमीत पळून जायचं ठरवलं.
-
संतापलेल्या ऐश्वर्याला सौमित्रबरोबरच लग्न करायचं आहे.
-
त्यासाठी तिने सारंगशी लग्न करण्याचं ठरवत नवा डाव आखला आहे.
-
सौमित्रला किडनॅप करुन ऐन मांडवात सारंग ऐवजी सौमित्रबरोबरचच लग्न करण्याचा तिचा डाव आहे.
-
ऐश्वर्याचा हा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
-
ऐश्वर्याचं लग्न सौमित्रबरोबर होणार की सारंगबरोबर याची उत्कंठा असली तरी विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झाली आहे.
-
हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे.
-
हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ‘ठरलं तर मग’ मालिकेतली सायली येणार आहे.
-
मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”