-
बॉलीवूडच्या लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन.
-
सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. एवढंच नाहीतर घटस्फोट झाल्याचं म्हटलं जात आहे.
-
पण, घटस्फोटांच्या चर्चांवर अजूनपर्यंत अभिषेक आणि ऐश्वर्याने मौन पाळलं आहे.
-
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याचं कारण अभिनेत्री निम्रत कौर असल्याचं म्हटलं जात आहे.
-
सध्या अभिषेकचं नाव निम्रत कौरबरोबर जोडलं जात आहे. पण याआधी अभिषेकचं कोण-कोणत्या अभिनेत्रींबरोबर नाव जोडलं होतं? जाणून घ्या…
-
अभिषेक बच्चनचं सर्वात आधी अफेअर मॉडेल, अभिनेत्री दीपानिता शर्माबरोबर होतं. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने दीपानिता आणि अभिषेकची भेट करून दिली होती.
-
अभिषेक आणि दीपानिता एकमेकांना १० महिने डेट करत होते. पण, अभिषेकला त्यांचं नातं लाइमलाइटमध्ये यावं असं वाटतं नव्हतं. म्हणून दोघं वेगळे झाले.
-
दीपानितानंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचं अफेअर खूप चर्चेत होतं. बहीण श्वेता बच्चनच्या लग्नाच्यावेळी अभिषेक आणि करिश्माची ओळख झाली होती.
-
अभिषेक आणि करिश्मा एकमेकांना जवळपास पाच वर्ष डेट करत होते. त्यानंतर २००२मध्ये एका कार्यक्रमात जया बच्चन यांनी अभिषेक आणि करिश्माच्या लग्नाची घोषणा केली होती.
-
जया बच्चन यांच्या घोषणेनंतर अभिषेक आणि करिश्माच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. पण काही दिवसांनंतर दोघांचं लग्न मोडल्याचं वृत्त आलं.
-
करिश्मानंतर अभिषेकचं नावं राणी मुखर्जीबरोबर जोडलं गेलं. दोघांचं नातं इतकं चांगलं होतं की, राणी मुखर्जी बच्चन कुटुंबाची सून होणार या चर्चांना वाव आला होता. पण, वेगळंच काहीतरी घडलं.
-
अभिषेक बच्चनचं लग्न ऐश्वर्याबरोबर झालं. दोघांच्या लग्नाबाबत ऐकताच सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.
-
‘गुरु’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिषेकने ऐश्वर्या रायला प्रपोज केलं होतं आणि एप्रिल २००७मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.
-
लग्नाच्या चार वर्षांनंतर अभिषेक आणि ऐश्वर्या आई-बाबा झाले. त्यांना आराध्या झाली.
-
पण, आता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून रंगल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस, जनसत्ता )

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा