-
अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या निर्णयाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात येत आहे.
-
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे किती आमदार राहिलेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
-
जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमचा आहे. सगळेच ५३ आमदार आमच्याकडं होते. त्यातील ९ जणांवर कारवाई केली आहे. ५३ पैकी ९ सोडून बाकीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत.”
-
“त्यामुळे आमदारांना संकटात टाकू नये. त्यांना प्रलोभने दाखवून दबाव टाकू नये. सर्वांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करून द्यावे, असं आवाहन करतो.”
-
न्यायालयात जाणार का? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी म्हटलं, “न्यायालयात जाण्याची गरज नाही.”
-
“आमचा पक्ष व्यवस्थित चालला आहे. महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे आमच्यापाठीमागे असेल, तर कोणत्याही भीतीचं कारण नाही.”
-
“थोड्याच दिवसात नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर व इतर काही जिल्हयात पवारसाहेब स्वतः दौरा सुरू करणार आहेत. हा झंझावात नाशिक जिल्हयातून सुरु होईल.”
-
“त्याअगोदर दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली की हा महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. पाऊस असो अथवा नसो शरद पवार बाहेर पडणार आहेत.”
-
“सातारच्या दौऱ्यावर जसे स्वागत झाले. त्याचपध्दतीने महाराष्ट्रात स्वागत जनता व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करतील,” असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल