-
भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
-
भारतीय संघ हा अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे.
-
उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने इंग्लंडचा चार धावांनी पराभव केला.
-
संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाचे विजयामध्ये मोठे योगदान आहे.
-
तीने अवघ्या २३ चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावले.
-
स्मृतीच्या खेळीनंतर चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.
-
भारताने इंग्लंडला १६५ धावांचे लक्ष्य दिले होते.
-
गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केल्यामुळे इंग्लंडला परावभ स्वीकारावा लागला.
-
भारताची नजर आता सुवर्णपदक जिंकण्यावर आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक