नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.
ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
पंतप्रधान मोदी यांनी दावा केला होता की, देशात काँग्रेसचं सरकार आलं तर ते लोक सर्वांची संपत्ती, हिंदू महिलांची मंगळसूत्रं ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटतील.
जातनिहाय जनगणना, देशाचे आर्थिक सर्वेक्षण आणि आर्थिक न्याय देणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी अशा मुद्द्यांच्या आधारावर काँग्रेस या निवडणुकीमध्ये मूलभूत मुद्द्यांवर सामान्यांचे लक्ष वेधू इच्छित असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
पहिल्या टप्प्यात जनमत भाजप विरोधात गेले आहे. त्यामुऴे भाजप अस्वस्थ आहे. म्हणून जात धर्म, हिंदू-मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, “व्होट बँकेच्या राजकारणामुळे आरक्षण देण्याचा खेळ करण्यात आला. काँग्रेसने असे प्रयोग जाणूनबुजून केले. हे सर्व संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे.
देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे.अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
ही देशाची निवडणूक असून देशाचा नेता निवडायचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकासाची गाडी सुसाट निघाली आहे. ‘असली पिक्चर अभी बाकी है.’ होय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा येथील सभेत म्हणाले.
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात मतदानाचे आकडे खाली आल्यामुळे सर्व काही ठीक नाही, अशा अपयशाचा अंदाज आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीभ घसरली आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, शाही परिवाराचे सल्लागार नुकतेच म्हणाले आहेत की आपल्या देशातील मध्यमवर्गीय लोक मेहनत करून पैसे कमावतात त्या पैशावर अधिक कर लावायला हवा.