नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.
ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
२६ एप्रिलपर्यंतच्या तीन आठवड्यांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ३८ रॅली आणि प्रबुद्ध संमेलनांना संबोधित केले होते. एआयसीसीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी सहारनपूर येथे पक्षाचे उमेदवार इम्रान मसूद यांच्यासाठी आयोजित केलेल्या एका रोड शोचे नेतृत्व केले.
सध्या देशात राजकीय अराजकता माजली असून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा कालखंड देशासाठी हानिकारक ठरला असल्याने त्यांना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस शहरात ड्रोन, पॅराग्लायडर, हलकी विमाने (लाइट एअर क्राफ्ट) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काहीही खोट काढता येत नव्हती. त्यामुळे मोदींनी तो कसा टाकाऊ आहे, हे लोकांना पटवून द्यायचे ठरवले. माझ्या मते, ही भाजपच्या पंतप्रधानाने काँग्रेसच्या जाहीरनाम्याला दिलेली सर्वोच्च मानवंदना आहे!
मोदी भारताचे हिटलर, अमित शहा गोबेल्स आहेत. या दोघांनी कोट्यावधी रुपये खर्च करून राहुल गांधींना बदनाम केले. मोदी यांच्या कारभारामुळे देश अडचणीत आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील नेते, भारतीय रक्षक आघाडी प्रमुख टेक्सास गायकवाड यांनी केली.
दहा वर्षाच्या कालावधीत भाजपने स्थिर सरकार देऊन देशाची अतुलनीय प्रगती केली आहे. पाच वर्षात देशाला पाच पंतप्रधान देण्याचे स्वप्न काँग्रेस पक्ष पाहत आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी
कोल्हापूर येथे काँग्रेसच्या रणनीतीवर सडकून टीका केली.
मतदानाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जेव्हा ४००चा पार आकड्याचा उल्लेख व्हायचा, तेव्हा जनता समाधानी आहे, त्यांना केंद्रात पुन्हा मोदी सरकार हवे आहे, असा त्याचा अर्थ घेतला जायचा.