ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने देशभरात संकल्प ते सिद्धी अभियान सुरू केले आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश जगात चौथ्या क्रमांकाची अर्थसत्ता म्हणून सज्ज झाल्याचा तसेच पारदर्शक कारभारातून देश भ्रष्टाचारमुक्त झाल्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, पण मंत्र्यांच्या परदेश दौर्यासाठी आहेत,” असा आरोप आमदार रोहित पवार यांनी नागपूर येथे केला. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना त्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेला ‘सर्वांची सोबत, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न’ हा निश्चय आता भारताची ओळख बनला आहे.
एकट्या छत्तीसगडमध्ये २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांतच सुरक्षा दलांनी २०९ माओवाद्यांना ठार मारले आहे. २०२४ मध्ये ही संख्या २१९ एवढी होती. २०२३ मध्ये सुरक्षा दलांनी राज्यभरात ५३ माओवाद्यांना ठार मारले होते.