ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
एकट्या छत्तीसगडमध्ये २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांतच सुरक्षा दलांनी २०९ माओवाद्यांना ठार मारले आहे. २०२४ मध्ये ही संख्या २१९ एवढी होती. २०२३ मध्ये सुरक्षा दलांनी राज्यभरात ५३ माओवाद्यांना ठार मारले होते.
शेतकरी उत्पन्न दुप्पट, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खिशात १५ लाख देणार, अण्णा हजारे, बाबा रामदेव यांनी पेट्रोलचे दर कमी करणार, लोकपाल याच काय झालं याच उत्तर मोदींनी दिलं पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.
नरेंद्र मोदी २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले, त्या वेळी भारतात सकारात्मक परिवर्तन आणि सांस्कृतिक प्रबोधनाचा जो प्रवास सुरू झाला, त्याला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
गेल्या ११ वर्षांमध्ये आपल्या सरकारने महिलाकेंद्रित विकासाला महत्त्व दिले असून सर्व क्षेत्रांमध्ये देशातील महिला चांगली कामगिरी करून अनेकांना प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
गेली ११ वर्षे राहुल गांधी विजय मल्ल्या पलायन, राफेल खरेदी, ऑपरेशन सिंदूर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सातत्याने मोदी सरकारला प्रश्न विचारत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातील त्यांच्या ताज्या टिप्पणीमुळे राजकीय वादळ निर्माण केले आहे. पण या वेळी पहिल्यांदाच मोदी सरकारला स्वत:चा बचाव करणे अवघड झाल्याचे दिसते आहे.
Chenab Bridge: खरं तर चिनाब नदीवर या पुलाचं बांधकाम करणं हे सर्वात मोठं आव्हान मानलं जात होतं, त्यामुळे जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज हा एक अभियांत्रिकी चमत्कारच आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भारत आणि पाकिस्तान संघर्षा दरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली, या बाबतचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने करावा, अशी मागणी केली.
‘‘लोकसभेचे विरोधी पक्ष झाल्यावर देखील राहुल गांधी बालबुद्धीचेच राहिले असून त्यांच्याकडे हे पद सांभाळण्याची परिपक्वता नाही हेच सिद्ध होते,’’ अशी टीका भाजपचे प्रवक्ता व राज्यसभेचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केली.
गाझा पट्टीतील इस्रायलच्या हल्ल्यांची तीव्रता कमी झालेली नाही. बेघर आणि खंक झालेल्या गाझावासीयांना इस्रायली गोळ्यांपासून जितका धोका आहे तितकाच तो उपासमारीपासूनही आहे.
‘‘उत्पादन क्षेत्रात अमेरिकेला पुन्हा चांगले दिवस आणायचे असून व्यापारी तूट कमी करण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे,’’ या भूमिकेचा लुटनिक यांनी पुनरुच्चार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून परिस्थितीचा आठावा घेतला.