Maharashtra Anant Chaturdashi Live Updates, 29 September 2023 : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर आज (२८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मानाचे गणपती विसर्जित होत आहेत. दुसरीकडे राज्यात सगळीकडे पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. गणपती विसर्जनासह राज्यातील प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…
Mumbai Pune Konkan Maharashtra Ganpati Visarjan 2023 Live Updates : गणपती विसर्जनासह राज्यातील प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…
नागपूर : नागपूर जिल्ह्याला शुक्रवारी रात्री पावसाने झोडपल्याने अंबाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला. त्यामुळे शहरातील अनेक नाल्यांना पूर आल्याने अंबाझरी, डागा ले-आऊट, शंकरनगरसह अनेक भागात पूर व पावसाचे पाणी तुंबले. परिणामी, महावितरणचे जिल्ह्यात ४५ लाखांचे नुकसान झाले. त्यापैकी सर्वाधिक ८० टक्के हानी शहरी भागात झाली आहे.
वर्धा येथील बोर व्याघ्र प्रकल्पालगत सालई गावात एक मोठा पक्षी वरून खाली पडल्याचे युवकांना दिसून आले.
या बैठकीला भाजपा धार्जिण्या लोकांनी जरूर जावे मात्र ओबीसींच्या लढ्यात खर्या अर्थाने सक्रीय असलेल्यांनी या डुप्लीकेट बैठकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
जास्तीचे पाणी मिळावे यासाठी बहुतेकांकडून नळाला वीज मोटार जोडली जाते. या मोटारीला घाईत ओला हात लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते.
जल प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती गोदावरीसह उपनद्यांच्या पात्रात विसर्जित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कुणी त्याचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चार उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, ५६ निरीक्षक, १२५ उपनिरीक्षक आणि दोन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत असतील.
पावसाचा वेग वाढून जायकवाडीच्या जलसाठ्यात वाढ झाल्यास हा प्रश्न उद्भवणार नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचित केले.
दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेकडे जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली ३० सप्टेंबर २०२३ ही अंतिम मुदत, त्या आधीच आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे गुरुवारीच (२८ सप्टेंबर) संपुष्टात येणार आहे.
पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता वेगाने सुरू आहे. हा मार्ग एकूण २८० किलोमीटरचा असून, त्यांपैकी ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ गुरुवारी मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून करण्यात आला.
भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुण्यातील गणेशोत्सवामधील विसर्जन मिरवणुकीकडे पुणेकर नागरिकांचे दरवर्षी लक्ष लागून असते. या मिरवणुकीत शहरातील विविध संस्था आणि संघटना मिरवणूक पाहण्यास येणार्या नागरिकांना सेवा देण्याच काम करीत असतात. त्यापैकीच पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमी ही संस्था २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या संस्थेमार्फत आजवर मंडई चौक ते अलका टॉकीज चौका दरम्यान येणार्या ११ चौकात सामाजिक विषयावर रांगोळ्या साकारून नागरिकाचे प्रबोधन करण्याच काम केले आहे. तर, यंदाच्या वर्षी देखील ही परंपरा कायम राखत सायबर क्राईमवर आधारित भव्य अशा रांगोळ्या साकारल्या आहेत. तर या पुणेकर नागरिकांनी रांगोळ्या पाहण्यास एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे.
पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुक पाहण्यास विविध भागातून हजारोच्या संख्येने भाविक येत असतात.तर आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीला मंडई चौक येथून मानाचा पहिला कसबा गणपतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती करून सुरूवात झाली आहे.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी निघाला असून बेलबाग चौकातून मार्गस्थ झाला आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पुणे पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनानंही चोख व्यवस्था केली आहे. बंदोबस्तासाठी तब्बल ९ हजार पोलीस पुण्यात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. पुण्यातील १७ मुख्य रस्ते मिरवणुकीच्या निमित्ताने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
जल्लोषात निघणाऱ्या मिरवणुका पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. गिरगाव, दादर, जुहू, मालाड, मालवणी टी जंक्शन आणि गणेशघाट पवई यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. महापालिकेनेही नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जनस्थळांवर गर्दी हाताळण्याच्या दृष्टीने सिद्धता केली आहे. मध्य रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रवाशांसाठी १० विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सीएसएमटी – कल्याण, ठाणे, बेलापूरदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी, गुरुवारी गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल केले आहेत.
भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव येथे जनुना तलावात गणेश विसर्जन करून शहरात परत येताना जनुना चौफुल्लीवर एक अपघात घडला. अकोल्याकडे जाणाऱ्या भरभाव ट्रकने ॲपेला जोरदार धडक दिली. या धडकेत ॲपेमधील गणेश मंडळाचे काही लोक जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी अग्निशमन पोहचले, मात्र गाडीतील फायर पंप नादुरुस्त असल्याने आग विझवण्यात वेळ लागला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते आणि ट्रक व त्यामधील साबण जळून खाक झाले. त्यानंतर दुसऱ्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली.
सोसायटीचे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी आधी संबंधित महिलेवर अरेरावी केल्यानंतर मोबाईलही हिसकावून घेतला.
लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी सुरू, थोड्याच वेळात मुंबईच्या लालबाग परिसरातून मिरवणूक निघणार, विसर्जना आधी स्थानिक कोळी महिलांकडून बाप्पांची कोळीगीत, कोळी नृत्य सादर
मंडळांना मागील वर्षाचेच क्रमांक; विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई; पोलिसांचा इशारा (संग्रहित छायाचित्र)