scorecardresearch

Premium

मनमाड : विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

जास्तीचे पाणी मिळावे यासाठी बहुतेकांकडून नळाला वीज मोटार जोडली जाते. या मोटारीला घाईत ओला हात लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते.

manmad woman electric shock, woman dies by electrocution in manmad, woman dies by electrocution after touching electric motor
मनमाड : विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

मनमाड : शहरातील शाकुंतल नगरात पाणी भरण्यासाठी लावलेल्या वीज मोटारीला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. पावसाअभावी शहरास टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महिन्यातून एकदाच नळाव्दारे पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पाणी आल्यावर ते भरण्यासाठी मोठी लगबग असते. याच धावपळीत महिलेला प्राण गमवावे लागल्याची भावना व्यक्त होत आहे. नगरपालिकेकडून दुपारी नळाला पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे जास्तीचे पाणी मिळावे यासाठी बहुतेकांकडून नळाला वीज मोटार जोडली जाते. या मोटारीला घाईत ओला हात लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर ६७ सीसीटीव्ही कॅमेरे, सहा ड्रोनद्वारे नजर; साडेतीन हजार अधिकारी, जवानांचा बंदोबस्तात सहभाग

why high blood sugar and blood pressure are a risky mix here what you need to check what doctor said read
उच्च रक्तदाबासह मधुमेह असल्यास सावधान! वेळीच काळजी घ्या अन् डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करा फॉलो
pune prices of fruits and leafy vegetables, fruits and leafy vegetables price in pune, fruits and leafy vegetables price increased in pune
पुणे : मागणी वाढल्याने भाज्या महाग, गृहिणींच्या खर्चावर ताण
Tirgrahi Yog 2023 in Kanya
येत्या दोन दिवसात त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? सूर्य-बुध-मंगळदेवाच्या कृपने वाढू शकतो बँक बॅलन्स
traditional methods prevents specs early age
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: लहान मुलांचा चष्मा

विजेचा धक्का लागून जयश्री महिरे (४८, शकुंलनगर, मनमाड) या महिलेचा मृत्यू झाला. मनमाडच्या भीषण पाणी टंचाईने महिलेचा बळी घेतल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे. संपूर्ण पावसाळ्यातही मनमाडला टंचाईला तोंड द्यावे लागते. महिन्यातून एकदाच नळातून पाणी पुरवठा केला जातो. जेव्हा एखाद्या भागात पाणी पुरवठा होणार असतो, तेव्हा कितीही महत्वाची कामे असली तरी नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. कारण, त्या काळात घरात पाणी भरून ठेवले नाही तर महिनाभर पाणी मिळणार नसते. पाणी आल्यानंतर एकच धावपळ उडते. शक्य तितका साठा करावा लागतो. त्याच धावपळीत महिलेचा बळी गेल्याचे सांगितले जाते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In manmad 48 year old woman dies by electrocution after touching electric motor at shakuntal nagar css

First published on: 28-09-2023 at 11:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×