लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनमाड: बिहारमधून मुलांच्या तस्करीप्रकरणी या मुलांचे पालक मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांचे जाब -जबाब नोंदविले जात आहेत. या मुलांना आम्ही आमच्या मर्जीने शिक्षणासाठी महाराष्ट्रात पाठवले. आमची आर्थिक परिस्थिती नसल्याने हा निर्णय घेतला. मात्र रेल्वे पोलिसांनी संबंधितावर तस्करीचा गुन्हा दाखल केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

बहुसंख्य पालक हे सामान्य आर्थिक परिस्थितीतील व अशिक्षित असल्याचे आढळून आले. मात्र वास्तव पोलिसांच्या सर्वंकक्ष तपासणी नंतरच बाहेर येईल. दरम्यान लोहमार्ग पोलिस ठाण्यातून दोन पथके बिहार व सांगलीच्या दिशेने रवाना झाली. या तपासात मदरसा आहे का, त्याची नोंदणी आहे का, यासह विविध मुद्यांंबाबत पथक सखोल चौकशी करणार आहे. तपासासाठी वेळ कमी असल्याने शीघ्रगतीने तपास करण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे. ५९ मुलांपैकी ३६ मुलांचे पालक कागदपत्रांसह येथील रेल्वे पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

हेही वाचा… शेतकरी संवादातून काँग्रेसतर्फे मोर्चेबांधणी; चांदवडला लवकरच शेतकरी संवाद मेळावा

जळगाव येथील बालसुधारगृहातील त्यापैकी २० मुलांचे पालक (आई, वडील) कागदपत्रे घेऊन गयारी (ता. अररिया, बिहार) येथून भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. मनमाड पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा नूतन पदभार सांभाळणारे मारुती पंडित यांच्याशी संपर्क साधून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. उर्वरित ३० मुलांना नाशिकच्या बालसुधारगृहात दाखल केले आले. त्यापैकी १६ मुलांचे पालक छत्तीस तासांचा प्रवासानंतर भुसावळमध्ये दाखल झाले. त्यानंतर १६ पालकांनी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदविला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The parents have expressed their displeasure over the railway police registering a case of trafficking against the concerned dvr