-
देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अर्थात ‘एक देश, एक निवडणूक’’ संदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. (All Photos- ANI)
-
या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपदेखील झाले आहेत.
-
‘वन नेशन, वन इलेक्शन’वरुन विरोधकांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
-
काही दिवसांपूर्वी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बाबतचा एक अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने सरकारकडे दिला.
-
काल (१५ एप्रिल) एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन नेशन,वन इलेक्शन’ मुद्यावर भाष्य केले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “वन नेशन वन इलेक्शन ही आमची कटिबद्धता आहे. यासंदर्भात आम्ही संसदेमध्येही चर्चा केली.”
-
ते पुढे म्हणाले, “याबाबत आम्ही एक समितीही स्थापन केली होती. या समितीचा अहवालही आलेला आहे. या अहवालामध्ये अनेकांनी सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना केल्या आहेत.”
-
“जर आम्ही हा अहवाल अंमलात आणू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा