-
सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
-
पण सतीश यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
-
सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली.
-
पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासची पत्नी सान्वी मालू पतीवर गंभीर आरोप करत आहे.
-
सतीश यांची हत्या विकासने केली असल्याचा आरोप सान्वी सातत्याने करत आहे.
-
विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते.
-
त्याच्याकडे १५ कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते आणि या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली असल्याचं सान्वी म्हणत आहे.
-
आता या सगळ्या प्रकरणावर सतीश यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी मौन सोडलं आहे.
-
‘एबीपी न्यूज’शी संवाद साधताना शशी म्हणाल्या, “पोलिसांनी संपूर्ण तपास केला आहे. यानंतरही सतीश यांची हत्या करण्यात आली असं ती (सान्वी मालू) का बोलत आहे? हे कळत नाही”.
-
“पोलिसांनीही या प्रकरणामध्ये तपास करावा असंही मला वाटत नाही. कारण जे काही घडलं ते सगळं समोर आहे”.
-
पुढे त्या म्हणाल्या, “सतीश यांच्या निधनानंतरही अशा गोष्टींची चर्चा होत आहे हे खूप चुकीचं आहे.तिला तिच्या पतीकडून पैसे हवे आहेत. म्हणून सतीश यांना ती यामध्ये सहभागी करुन घेत आहे”.
-
“मी तिला विनंती करते की, कृपया असं काही करू नको. जर सतीश यांनी १५ कोटी रुपयांची उलाढाल केली असती तर त्यांनी मला तसं सांगितलं असतं”.
-
“मला या प्रकरणाबाबत आणखी काही बोलायचं नाही. याची पोलीस चौकशी व्हावी अशीही माझी इच्छा नाही”.
-
शशी कौशिक यांनी संपूर्ण आरोप फेटाळले आहेत.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम, फेसबुक)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case