-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतल्या सार्थक आणि आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
सार्थकचं आनंदीवर जीवापाड प्रेम आहे.
-
आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो.
-
सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पहाताना मिळते.
-
लवकरच संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने हे दोघं पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
-
सार्थक आणि आनंदीची हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न हे सगळे विधी अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत.
-
आनंदी-सार्थकच्या परिवाराबरोबरच स्टार प्रवाहच्या कुटुंबातले सदस्यही या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित रहाणार आहेत.
-
कला-अद्वैत, जानकी-हृषिकेश, पिंकी-युवराज, नित्या-अधिराज, सायली-अर्जुन या स्टार प्रवाहच्या लोकप्रिय जोड्या आनंदी-सार्थकला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक