-
झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
-
या मालिकेतील कथानक सध्या अत्यंत नाट्यमय वळणावर पोहोचले आहे.
-
भावना आणि सिद्धूच्या लग्नामुळे गावात व गाडे पाटलांच्या घरात वेगवेगळ्या घडामोडी घडत असतानाच या लग्नाचा भव्य सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
सुरुवातीला विरोध झाला असला तरी पक्षाच्या दबावामुळे गाडे पाटलांना अखेर लग्नासाठी संमती द्यावी लागली.
-
सिद्धू म्हणजे गाडेपाटलांचा लाडका राजकुमार आणि त्याचं लग्नही तेव्हढ्याच थाटात होणार, यात काही शंका नाही.
-
या मालिकेत सिद्धूची घोड्यावर दमदार एन्ट्री, ब्रास बँडचा गाजावाजा आणि साऱ्या गावाचा उत्साह दाखवण्यात आला आहे.
-
या सुंदर दृश्यामागे संपूर्ण युनिटची अफाट मेहनत लपलेली आहे.
-
पावसाळ्यात हे शुटिंग पार पडल्यामुळे वेळोवेळी पाऊस अडथळा ठरला.
-
शुटिंग सुरू व्हायचे, तसेच पावसाची संततधार सुरू व्हायची, त्यामुळे पुन्हा पुन्हा चित्रीकरण थांबवावे लागले.
-
परंतु सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी मिळून जिद्दीने तब्बल १० तास या वरातीचे शूट केले.
-
प्रेक्षकांसमोर दृश्य जसे रंगतदार दिसते, तसे ते पडद्यामागे घडवण्यासाठी खूप संयम, तयारी आणि समन्वय लागतो.
-
लग्नाच्या जवळपास प्रत्येक सीनमध्ये एकाच वेळी २५-३० कलाकार, ब्रास बँड, घोडा, सजावट आणि इतर टेक्निकल गोष्टी हाताळणं हे युनिटसाठी मोठे आव्हान ठरले.
-
पण शेवटी म्हणतात ना ज्या जन्मगाठी स्वर्गात बांधल्या जातात, त्या कोणत्याही अडथळ्यामुळे तुटत नाहीत! भावना-सिद्धूचं हे लग्न त्याचे प्रतीक ठरले.
-
हे लग्न म्हणजे नात्यांमधील गुंतागुंत, राजकीय दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचा संगम असून, ही मालिका पुढे काय वळण घेते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
-
सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम (हेही पाहा : ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम साईराज पोहोचला वारीत; ‘हे’ रूप पाहून भारावलेले वारकरी झाले नतमस्तक)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”