-
मल्याळम अभिनेते-पुढारी सुरेश गोपी यांनी केरळमधील भाजपचे पहिले खासदार बनून, लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पहिला विजय नोंदवून इतिहास घडवला आहे. (@Suressh Gopi/FB)
-
त्यांनी त्रिशूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) उमेदवार सुनील कुमार यांचा ७४,६८६ मतांनी पराभव केला. (PTI)
-
गोपी, पक्षाचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांच्यासह केरळमधील भाजपचे एकमेव उमेदवार होते ज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. (@Suressh Gopi/FB)
-
त्रिशूरचे खासदार सुरेश गोपी, रविवारी ९ जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, त्यानंतर त्यांनी अभिनयासाठी मंत्रीपद सोडणार असल्याच्या बातम्या चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. (PTI)
-
आता याबाबत त्यांनी ट्विट करत खुलासा केला. मी राजीनामा देणार नाही असे त्यांनी सांगितले. “मी मोदी सरकारच्या मंत्रिपरिषदेचा राजीनामा देणार असल्याच्या चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत”, असे त्यांनी ट्विट केले. (@Suressh Gopi/FB)
-
मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात गोपी यांच्यावर पेट्रोलियम व नॅचरल गॅस आणि टुरिझम या खात्याची जबाबदारी टाकली आहे. (PTI)
-
सुरेश गोपी एक अभिनेते, राजकारणी, पार्श्वगायक आणि टेलिव्हिजन सूत्रसंचालक आहेत. त्यांनी प्रामुख्याने मल्याळम चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषेतही काही चित्रपट केले आहेत. (@Suressh Gopi/FB)
-
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२३ मध्ये ‘गरुदान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. (@Suressh Gopi/FB)
-
दरम्यान, २०१६ ते २०२२ या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. पर्यावरण प्रेमी म्हणून सुद्धा सुरेश गोपी प्रसिद्ध आहेत. (@Suressh Gopi/FB) हेही पहा- Raksha Khadse : मोदी मंत्रीमंडळातील ७ कॅबिनेट महिला मंत्र्यांमध्ये रक्षा खडसे सर्वात …

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?