-
शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन मेळावा मुंबईत वरळी येथे पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार उपनेते, जिल्हाप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Photo source- Sankhadeep Banerjee)
-
‘युतीसाठी लाचार झालेत’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि मनसेतील संभाव्य युतीवर टीका केली.(Photo source- Sankhadeep Banerjee)
-
“देश जिंकला, महाराष्ट्र जिंकला आता मुंबई महापालिका जिंकून भगव्याची हॅट्ट्रिक करू”, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (Photo source- Sankhadeep Banerjee)
-
‘कोणत्याही परिस्थितीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक आपण जिंकणार आहोत’, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.(Photo source- Sankhadeep Banerjee)
-
“हिंदुत्व आणि मराठी माणसांशी विश्वासघात केल्यानंतर आता ते युती करता का? युती करतात का? म्हणत उतावळे आणि लाचार झालेत”, असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. (Photo source- Sankhadeep Banerjee)
-
“हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगामध्ये टाकतात, तुमच्या नाकर्तेपणामुळे मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला”, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली. (Photo source- Sankhadeep Banerjee)
-
“बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली, पण कधी विचार सोडले नाहीत. कधीही हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणाऱ्यांनी लाचारी पत्करली”, असंही शिंदे म्हणाले.(Photo source- Sankhadeep Banerjee)
-
“माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. पण सत्तेत असताना सर्वांना कस्पटासमान समजणाऱ्यांची आज काय अवस्था झाली?”, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. (Photo source- Sankhadeep Banerjee)
-
“मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी शिवसेना मेळाव्यात जोरदार टोलेबाजी करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. (Photo source- Sankhadeep Banerjee)
-
“बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे आणि सत्तेचा मोह व सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती आली”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. (Photo source- Sankhadeep Banerjee)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक