आगामी लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी सत्तेत आली, तर पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जाईल, असं विधान लालू प्रसाद यादव यांची मुलगी तथा बिहारमधील पाटलीपुत्र मतदारसंघाच्या आरजेडीच्या उमेदवार मीसा भारती यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपानेही त्यांच्या विधानाचा निषेध करत, विरोधकांकडून खालच्या पातळीचं राजकारण केलं जात असल्याची अशी टीका केली आहे.