scorecardresearch

काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Congress Leader Sangeeta Tiwari
“आंदोलन, प्रचाराला महिला हव्यात, पण…”, काँग्रेसच्या महिला नेत्याचा गंभीर आरोप; राहुल गांधींसह सर्व ज्येष्ठ नेत्यांचं नाव घेत म्हणाल्या…

काँग्रेसमधील महिला नेत्या संगीता तिवारी या काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. महिला कार्यालय बंद केल्याच्या कारणावरून त्यांनी हा निर्णय घेतला…

Congress tries to embarrass Union External Affairs Minister S Jaishankar
काँग्रेसकडून परराष्ट्रमंत्र्यांच्या कोंडीचा प्रयत्न

पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिल्याच्या विधानावरून काँग्रेसने केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सोमवारीही चालू ठेवला.

nashik congress news in marathi
काँग्रेसच्या तिरंगा फेरीत शहिदांना श्रद्धांजली

भारताचे जे जवान शहीद झाले, त्यांना नमन करून तसेच भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी शहर काँग्रेसच्यावतीने तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले…

गुजरातमधील ढासळत्या काँग्रेस नेतृत्वाला कारणीभूत नेमकं काय?

राहुल गांधी यांनी मार्चमध्ये अहमदाबादच्या दौऱ्यादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा त्यांनी काँग्रेस नेत्यांचा एक गट भाजपाशी संगनमत करीत…

Himanta Biswa Sarma - Gaurav Gogoi
“ISI च्या निमंत्रणावरून गौरव गोगोईंचा पाकिस्तान दौरा, तिथे संशयास्पद…”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

Assam CM on Gaurav Gogoi : आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं गौरव गोगोई यांनी म्हटलं आहे.

Supriya Sule, Varsha Gaikwad and Arvind Sawant
१७ खासदारांना ‘संसदरत्न’ सन्मान; राज्यात सात जणांचा समावेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील १७ खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांची यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात…

tuljapur drug case raid exposed online Matka four arrested with gambling materials Saturday night
तुळजापुरात मोठा ‘डिजिटल’ मटका खेळ भाजप व काँग्रेसचे पदाधिकारीच ‘बुकी’चालक

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी टाकलेल्या छाप्यात ऑनलाइन मटका जुगार उघडकीस आला. चार जणांना पोलिसांनी मटका खेळण्याच्या साहित्यासह…

tirangi yatra dharamnagar
थरूर यांच्या निवडीने वाद; सर्वपक्षीय सात शिष्टमंडळ प्रमुखांची नावे जाहीर; काँग्रेसकडून टीका

पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांवरून वाद निर्माण झाला आहे.

Rahul Gandhi targets foreign minister S Jaishankar
Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा…

Shashi Tharoor Operation Sindoor
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळासाठी काँग्रेसने शशी थरूर यांचं नाव का वगळलं? तरीही केंद्राने त्यांच्यावर का सोपवली जबाबदारी? फ्रीमियम स्टोरी

केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ७ सदस्यांच्या संसदीय शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यावर देखील महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

PM Modi With Army
Operation Sindoor: “ऑपरेशन सिंदूरमधून पंतप्रधान मोदी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत”, काँग्रेसचा आरोप

Operation Sindoor News: काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, ते आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीमंडळांत निश्चितपणे सहभागी होतील. परंतु ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या…

Rahul Gandhi rally in jalna loksatta
जातनिहाय जनगणनेवरील चर्चेसाठी कार्यक्रमाच्या हालचाली, राहुल गांधी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न

राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या