जागतिक आरोग्य संघटना या संस्थेच्या १,६५० जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार आणि ऑगस्ट २०२२ मध्ये अमेरिका स्थित हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटने केलेल्या सात हजार जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार, भारताचा राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील (Delhi City) हवेची गुणवत्ता जगातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये खूप वाईट आहे.
दिल्लीच्या आसपासच्या शहरांवर त्याचा परिणाम होत आहे. भारतामध्ये दरवर्षी वायू प्रदूषणामुळे सुमारे २ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीवरील प्रदूषणावर भाष्य करताना “दिल्लीची अवस्था नरकापेक्षा वाईट आहे” असे विधान तकेले होते. औद्योगिक प्रगतीमुळे येथे कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. यांच्यासह बांधकाम, लोकसंख्ये होणारी वाढ अशा कारणांमुळे दिल्लीमध्ये वायू प्रदूषण (Delhi Pollution)वाढत आहे. यासाठी सरकारने अनेक नियम देखील केले आहेत.
करोना काळामध्ये ही स्थिती काहीशी सुधारली होती, पण सर्वकाही सुरु झाल्यानंतर पुन्हा प्रदूषण वाढू लागले. सध्या दिल्लीचा एयर क्लालिटी इंडेक्स १६०-१७० यांमध्ये आहे.Read More
राज्यातील निम्म्याहून अधिक शहरांनी निर्धारित मर्यादेपेक्षा धूलिकणांची पातळी (४०) ओलांडली. आरोग्याच्या दृष्टीने हा गंभीर धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
प्रदूषण मोजणारे मॉनिटर्स, सॅटेलाइट, अल्गोरिदम आणि सरकारी अॅप्स ही केवळ साधने नसून प्रदूषणाच्या राजकीयीकरणाचे सक्रिय घटकच ठरतात. ‘योगायोगां’ची मालिका नेमकी…
प्रदूषणावर कृत्रिम पाऊस ही दीर्घकालीन उपाययोजना नाही, असे तज्ज्ञ सांगतात. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करणाऱ्या आयआयटी कानपूरच्या संचालकांचेही हेच…
Delhi Air Pollution: सर्वोच्च न्यायालयाने हिरव्या फटाक्यांवरील बंदी उठवल्यानंतर दिल्लीतील लोकांनी रात्रभर फटाक्यांची आतिषबाजी केली. ज्यामुळे आता राजधानीतील हवा अत्यंत…
Delhi Red Fort turning Black दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचा दुष्परिणाम केवळ नागरिकांच्या आरोग्यावरच नव्हे, तर शहरातील ऐतिहासिक वास्तूंवरदेखील होताना दिसत आहे.