scorecardresearch

मराठा आरक्षण

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.
Read More
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Live Updates : “आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल तर आधी…” उच्च न्यायालयाचे मनोज जरांगेंना निर्देश

Today’s Live Marathi News : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

Prakash Ambedkar post on Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest
Prakash Ambedkar : “गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका”, मनोज जरांगेंना उद्देशून केलेली प्रकाश आंबेडकरांची पोस्ट चर्चेत

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Manoj Jarange Mumbai Protest
‘मराठा आरक्षणा’वरून सरकार उलथून टाकू; मनोज जरांगेंचा इशारा; मुंबईतील उपोषणावर ठाम…

२९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांनी आडमुठेपणा सोडून मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.

babanrao taiwade manoj jarange loksatta
सरकार पाडणार म्हणणाऱ्या जरांगेंना तायवाडेंचा सवाल, “तुमच्याकडे आमदार किती?”

मराठा आरक्षण मिळाले नाही तर मनोज जरांगे सरकार पाडण्याची भाषा करताहेत, त्यांच्यामागे आमदार किती असा सवाल तायवाडे यांनी विचारला.

manoj jarange parinay fuke
Parinay Fuke : आज शिवाजी महाराज असते तर, जरांगेची जीभ छाटली असती… – भाजप आमदार परिणय फुके

भाजप नेते व विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेचा समाचार घेतला.

Manoj Jarange Patil vs Chitra Wagh
“आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू…”, मनोज जरांगेंचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात; म्हणाले, “सगळं बाहेर काढेन…”

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील म्हणाले, “चित्रा वाघ म्हणतायत की मी शिवी दिली. परंतु, मी…

manoj jarange issues warning to maharashtra government devendra fadnavis cm
“आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही”, मनोज जरांगे यांचा संदेश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका!

देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

Chief Minister Devendra Fadnavis reiterates his stance on Maratha reservation in Chimur
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “महायुती सरकारनेच…’

चिमूर येथे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यातर्फे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावली.

chhagan bhujbal urges obc unity and caste census in nashik  OBC Maratha reservation politics
OBC Reservation : ओबीसी समाजाला लढाई जिंकायची असेल तर…छगन भुजबळ यांचा कानमंत्र

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केल्यापासून ओबीसी समाजातील नेतेही सक्रिय झाले आहेत.

manoj jarange patil reacts to maratha subcommittee restructure
उपसमिती पुनर्रचना म्हणजे पोळ्याच्या दिवशी खांदेबदल ! मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

मनोज जरांगे-पाटील यांनी उपसमिती पुनर्रचनेवर टीका करत मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला.

संबंधित बातम्या