ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.
राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.
आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.Read More
पाकिस्तानमध्ये २७ वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर तिथे लष्कराच्या हातात अधिकृतपणे सर्व सूत्रे हाती आल्याची स्थिती आहे. भारताबरोबर ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेल्या संघर्षानंतर…
Sri Lanka Team Security Video: श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोट झाला. यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी पाकिस्तानने मोठी…
पाकिस्तानमध्ये कोणतेही लष्करी बंड न करता, तेथील लोकनियुक्त सरकारचे अभूतपूर्व अवमूल्यन करण्याचे श्रेय त्या देशाचे लष्करप्रमुख सैयद असिम मुनीर यांना द्यावेच…
Pakistan Military Politics : पाकिस्तानात प्रस्तावित २७व्या घटनादुरुस्तीमुळे तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या दुरुस्तीविरोधात पाकिस्तानात अनेक ठिकाणी तीव्र…
Pakistan Suicide Bomb Attack पाकिस्तानमधील इस्लामाबाद शहरातील जिल्हा न्यायालयाच्या संकुलाबाहेर बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात जवळपास १२ जणांचा मृत्यू झाला असून…
Pakistan Navy in Bangladesh: पाकिस्तानी नौदलाची युद्धनौका ‘पीएनएस सैफ’ बांगलादेशमध्ये दाखल झाल्यानंतर अॅडमिरल अशरफ बांगलादेशात पोहोचले. ही युद्धनौका बांगलादेशच्या आग्नेय…