-
बिहारमधील पुर्णिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (१६ एप्रिल) सभा पार पडली. (सर्व फोटो साभार- BJP Bihar/Facebook Page)
-
पुर्णियातील सभेला मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे संतोष कुशवा या त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारासाठी ही सभा झाली.
-
नेपाळ तसेच बांगलादेश सीमेनजीक हा मतदारसंघ आहे. या सभेत घुसखोरांचा आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला.
-
“मोदींना कोणी रोखू शकणार नाही, हे सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे.” असा इशारा त्यांनी दिला.
-
याआधी गया येथील सभेत मोदींनी संविधानाचा संदर्भ देत, वंचितांच्या वेदना मला समजतात. संविधानामुळेच माझ्यासारखी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकली असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
-
पुन्हा सत्तेत आल्यास आमचे सरकार घुसखोर थांबवेल तसेच भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
-
मतपेढीच्या राजकारणामुळे घुसखोरी वाढल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
-
राष्ट्रीय जनता दलावर त्यांनी टीका केली. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी भाजपाला घटना बदलायची आहे असा आरोप केला होता. त्याला अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांनी या सभेत उत्तर दिले.
-
सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत, तृणमूल काँग्रेस घुसखोरांना संरक्षण देऊ पाहात आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.राज्यात तृणमूल काँग्रेसने गुंडांना मोकळे रान दिल्याची टीका पंतप्रधानांनी येथील सभेत केली.
-
राज्यात रामनवमी उत्सवाला तृणमूल सरकार विरोध करते. कोलकाता उच्च न्यायालयाने हावडा येथे विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय सत्याचा विजय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
-
संदेशखालीचा मुद्दा उपस्थित करत, गुन्हेगारांना तृणमूल काँग्रेसने कसे संरक्षण दिले? हे देशाने पाहिले आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी राज्यात फोफावल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस