-
१. मनाने हरलो तर हार निश्चित; पण मनाने जिंकलो तर विजय अटळ! कबीर म्हणतात – परमेश्वराला गाठायचं असेल तर मनावर विश्वास ठेवा. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
२. खऱ्या प्रेमाचा शोध घेत मी भटकत राहिलो, पण कुठेच सच्चा प्रेमी सापडला नाही. जेव्हा खरा प्रेमी दुसऱ्या खऱ्या प्रेमीला भेटतो, तेव्हा जगातील सगळं विषही अमृतासारखं वाटू लागतं. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
३. कधी काबा, कधी काशी — सर्वत्र एकच परमेश्वर! गहू दळल्यावर तोच मैदा उरतो, तसंच राम-रहीम भेद नाही उरत. कबीर तर शांतपणे त्याच परमात्म्याच्या प्रेमात मग्न आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
४. सगळं जग गाढ झोपलंय, पण संतांच्या डोळ्यांना झोपच येत नाही — कारण मृत्यू त्यांच्याच डोक्यावर उभा आहे, जणू वर लग्नाच्या बोहल्यावर आला आणि वेळ संपली. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
५. रडलो तर मन कमकुवत होतं, हसलो तर ईश्वर नाराज होतो… म्हणून आतल्या आतच सगळं सहन करावं लागतं – जसं कीडा लाकडातच आपली ओळ काढतो. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
६. सातही समुद्रांची शाई केली, जंगलातील सारे वृक्ष लेखणी बनवले आणि सगळ्या पृथ्वीला कागद केलं, तरीही हरिचे गुण लिहून संपणार नाहीत. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
७. जिवंतपणीच मरण शिकलो, तरच खऱ्या अर्थाने मुक्त होता येतं. जो मरण्यापूर्वीच आत्मबोध करून घेतो, त्याला ना काळ मारू शकतो, ना मृत्यू – तो अजय, तोच खरा अमर.
-
८. वाईट शोधायला बाहेर पडलो, पण कोणीच वाईट वाटला नाही… स्वतःच्या मनात डोकावून पाहिलं, तेव्हा उमगलं — खरं वाईटपण माझ्याच आत लपलं आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
९. शब्द असे बोला की मनातील अहंकार हरवून जावा, ते शब्द इतरांना शीतलता देतील आणि स्वतःलाही शांततेचा स्पर्श देतील. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
१०. संताची जात विचारू नका, त्याचं ज्ञान विचारून पाहा — कारण मोल तलवारीचं असतं, म्यानाचं नाही. (छायाचित्र: पेक्सेल्स)

Sonam Raghuvanshi Case: ‘सोनम रघुवंशी पतीची हत्या होताना पाहत होती’, अखेर आरोपींनी गुन्हा मान्य केला; पोलीस म्हणाले, ‘पहिला वार…’