-
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ ११ ऑगस्ट रोजी संपत आहे. आत्तापर्यंत भारतात अशी फक्त सहा नावे आहेत जे उपराष्ट्रपतींनंतर भारताचे राष्ट्रपती झाले.
-
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन १९५२ ते १९६२ पर्यंत देशाचे उपराष्ट्रपती होते. १९६२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले आणि १९६७ पर्यंत ते या पदावर होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस आर्काइव्ह)
-
झाकीर हुसेन हे १९६२ ते १९६७ पर्यंत उपराष्ट्रपती होते. त्यानंतर ते १३ मे १९६७ ते ३ मे १९६९ पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते.
-
व्ही.व्ही.गिरी १९६७ ते १९६९ पर्यंत देशाचे उपराष्ट्रपती राहिल्यानंतर १९६९ ते १९७४ पर्यंत राष्ट्रपती होते.
-
आर वेंकटरामन हे १९८४ ते १९८७ पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती होते. त्यानंतर १९८७ ते १९९२ पर्यंत त्यांनी राष्ट्रपती पद भूषवले. (छायाचित्र : राष्ट्रपती भवन सचिवालय)
-
१९८७ ते १९९२ पर्यंत देशाचे उपराष्ट्रपती असलेले शंकरदयाळ शर्मा यांनी १९९२ ते १९९७ पर्यंत राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. (छायाचित्र : राष्ट्रपती भवन सचिवालय)
-
केआर नारायणन हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्रपती बनलेले शेवटचे व्यक्ती होते. १९९२ ते १९९७ पर्यंत ते उपराष्ट्रपती आणि १९९७ ते २००२ पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते. (छायाचित्र : राष्ट्रपती भवन सचिवालय)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल