-    काँग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 
-    यानंतर काँग्रेसने सुधीर तांबेंचं निलंबन केलं. आता सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. 
-    अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (१६ जानेवारी) एबीपी माझाशी बोलताना याबाबत महत्त्वाची विधानं केली. त्याचा हा आढावा… 
-    आजही सुधीर तांबेंच्या आमदारकीची मुदत शिल्लक आहे – पृथ्वीराज चव्हाण 
-    ते ६ फेब्रुवारीपर्यंत विधान परिषदेचे सदस्य आहेत – पृथ्वीराज चव्हाण 
-    परंतु तोपर्यंत ते काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेतेही आहेत – पृथ्वीराज चव्हाण 
-    त्यामुळे त्यांना गटनेतेपदावरून निलंबित करून त्यांच्या जागेवर दुसरा नेता नेमला का याची मला माहिती नाही – पृथ्वीराज चव्हाण 
-    मात्र, तसा दुसरा नेता नेमावा लागेल. कारण काही दिवसांपूर्वीच सुधीर तांबेंना विधान परिषदेत काँग्रेस गटनेता केलं होतं – पृथ्वीराज चव्हाण 
-    सुधीर तांबेंना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने तिकीट दिलं होतं. त्यामुळे या शिस्तभंगाचा आणि शिस्तपालनाचा संबंध दिल्लीशी संबंधित आहे – पृथ्वीराज चव्हाण 
-    महाराष्ट्राचे अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीला काही शिफारस करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय एआयसीसीच करेल – पृथ्वीराज चव्हाण 
-    सुधीर तांबे यांच्या निलंबनाचा निर्णयही केंद्रीय शिस्तपालन समितीने घेतला होता – पृथ्वीराज चव्हाण 
-    त्या समितीचे सचिव तारिक अन्वर आहेत. त्यांच्या सहीने सुधीर तांबेंच्या निलंबनाचं पत्र निघालं आहे – पृथ्वीराज चव्हाण 
-    त्यामुळे आणखी कोणाचं निलंबन करायचं असेल तर त्यांच्या सहीनेच होईल – पृथ्वीराज चव्हाण 
-    सत्यजीत तांबेंच्या निलंबनाची माहिती महाराष्ट्रातून मिळणार नाही – पृथ्वीराज चव्हाण 
-    शिफारस महाराष्ट्रातून नक्की जाईल, मात्र निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या पातळीवर होईल – पृथ्वीराज चव्हाण 
-    सुधीर तांबेंचं निलंबन झालं आहे. आता त्यापुढे काय कारवाई करायची हा निर्णय तारिक अन्वर घेतील – पृथ्वीराज चव्हाण 
-    शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकूण २०-२२ लोकांनी अर्ज केले होते – पृथ्वीराज चव्हाण 
-    त्यातील एकाला आशीर्वाद द्यावा लागेल, अधिकृत मान्यता देऊन पाठिंबा द्यावा लागेल – पृथ्वीराज चव्हाण 
-    ती प्रक्रिया आता चालू आहे. अर्धा तासात त्याचा निर्णय होईल. याशिवाय नाशिक आणि नागपूरची काही सांगड घालायची का? हाही काही लोकांचा प्रयत्न आहे. काही वेळातच हे चित्र स्पष्ट होईल – पृथ्वीराज चव्हाण 
-    प्रश्न सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाचा नाही – पृथ्वीराज चव्हाण 
-    निर्माण झालेल्या या परिस्थितीत काँग्रेस आणि महाविकासआघाडीच्या सर्व घटकपक्षांनी यातून काय मार्ग काढायचा असा आहे – पृथ्वीराज चव्हाण 
-    कोणत्याही परिस्थितीत ही जागा भाजपाच्या विचाराच्या लोकांच्या हातात ही जागा जाऊ नये – पृथ्वीराज चव्हाण 
-    मविआच्या कुठल्याही एका उमेदवाराला सर्वांना समर्थन करावं, अशाप्रकारची चर्चा सुरू आहे – पृथ्वीराज चव्हाण 
-    काही लोकांना त्यात नागपूरचा प्रश्नही उपस्थित केला. त्यामुळे नागपूर, नाशिक यांची एकत्रित चर्चा होऊन मार्ग निघेल – पृथ्वीराज चव्हाण 
-    तसेच कोण अर्ज मागे घेत आहे आणि कोण नाही हे अर्धा तासात आपल्याला कळेल – पृथ्वीराज चव्हाण (सर्व फोटो संग्रहित) 
 
  ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का? 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  