-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली.
-
शेरोशायरीचा वापर करत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.
-
गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला, मात्र, शरद पवारांचं कौतुक केलं.
-
मोदी या भाषणात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
मी इतकंच सांगेन की, ‘किचड उसके पास था, मेरे पास गुलाल, जो भी जिसके पास था उसने दिया उछाल…’. तुम्ही जितका चिखल उडवाल तेवढं कमळ फुलेल – नरेंद्र मोदी
-
त्यामुळे कमळ फुलवण्यात विरोधकांचं जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान आहे त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो – नरेंद्र मोदी
-
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, आम्ही ६० वर्षात भक्कम पाया बनवला. आता त्यांची तक्रार होती की, पाया आम्ही तयार केला आणि श्रेय मोदी घेत आहे – नरेंद्र मोदी
-
मात्र, २०१४ मध्ये सत्तेत आल्यावर मी गोष्टी बारकाईने पाहिल्या. तेव्हा लक्षात आलं की, ६० वर्षे काँग्रेस परिवाराने केवळ खड्डेच खड्डे निर्माण केले होते – नरेंद्र मोदी
-
गांधी परिवाराचा हेतू चांगलाही असेल. मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीये. मात्र, त्यांनी खड्डेच खड्डे निर्माण केले – नरेंद्र मोदी
-
कोणत्याही कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर काहींच्या डोक्यावरील केसं उभं राहतात – नरेंद्र मोदी
-
आमच्याकडून कधीतरी चुकून नाव राहिलं गेलं असेल. ते आम्ही ठिक करु शकतो. कारण, ते देशाचे पहिले पंतप्रधान होते – नरेंद्र मोदी
-
मात्र, त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचं आडनाव लावण्यास का भिती वाटते. का नेहरुंचं आडनाव लावण्यास लाज वाटते – नरेंद्र मोदी
-
काही लोकांचा व्यवहार हा निराशजनक आहे. या सदस्यांना मी सांगू इच्छितो की, ‘जेवढा तुम्ही चिखल उडवणार, तेवढं कमळ उगवणार’. आमच्या यशात तुमचं योगदान विसरणार नाही – नरेंद्र मोदी
-
आमच्यावर राज्यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात येतो. पण, विरोधी पक्षात बसलेल्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर कसा केला, याचा सर्वांना दाखला देतो – नरेंद्र मोदी
-
इतिहास काढून पाहा कोणता पक्षा होता? आणि कोण सत्तेत बसलं होतं? ज्यांनी कलम ३५६ चा सर्वात जास्त दुरुपयोग केला – नरेंद्र मोदी
-
काँग्रेसने ९० वेळा निवडून आलेली सरकारं पाडली, तर पंतप्रधान इंदिरा गांधींनी ५० वेळा सरकार पाडलं – नरेंद्र मोदी
-
केरळमध्ये डाव्या विचारसारणीचे सरकार निवडून आलं होतं. ते पंडित जवाहरलाल नेहरुंना आवडलं नाही; आणि सरकार पाडलं – नरेंद्र मोदी
-
डाव्या पक्षांनी आज ते तिथे उभे आहात, पण तुमच्यासोबत काय झालं होतं, ते आठवा… – नरेंद्र मोदी
-
तामिळनाडूमध्ये एमजीआर आणि करुणानिधी यांच्यासारख्या दिग्गजांचं सरकारही याच काँग्रेसवाल्यांनी बरखास्त केलं होतं – नरेंद्र मोदी
-
एमजीआर यांचा आत्मा वरून पाहत असेल की तुम्ही कुणाच्या बाजुने उभे आहात – नरेंद्र मोदी
-
या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य तिथे मागे बसले आहेत. मी त्यांना नेहमी एक आदरणीय नेता मानतो, त्यांचं नाव श्रीमान शरद पवार – नरेंद्र मोदी
-
१९८० मध्ये शरद पवारांचं वय ३५ ते ४० वर्षे होतं. एक नवखा मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करायला निघाला होता. पण त्यांच्या सरकारला काँग्रेसने पाडलं – नरेंद्र मोदी
-
आज तेही काँग्रेसच्या बाजुने आहेत. प्रत्येक प्रादेशिक नेत्यांना काँग्रेसने त्रास दिला आहे – नरेंद्र मोदी
-
एनटीआर यांच्यासोबत काय झालं? ते जेव्हा उपचारासाठी अमेरिकेत गेले, त्याचवेळी काँग्रेसने एनटीआरचं सरकार पाडलं, ही काँग्रेसची राजनीती आहे – नरेंद्र मोदी
-
मागील तीन ते चार वर्षात साधारण ११ कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचलेले आहे – नरेंद्र मोदी
-
सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आम्ही जनधन योजनेद्वारे अनेक लोकांचे बँक खाते उघढले – नरेंद्र मोदी
-
मागील ९ वर्षात ४८ कोटी जनधन बँक खाते उघडण्यात आले – नरेंद्र मोदी (सर्व फोटो संग्रहित)

Ahmedabad Plane Crash: इंग्रजी न समजल्यामुळे २९ वर्षांपूर्वी झाला होता विमानाचा भीषण अपघात; ३४९ बळी घेणारी ती घटना नेमकी कोणती?