-
प्राचीन भारतातील महान विद्वान, तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ आणि कुशल राजकारणी आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या चाणक्य नीतिमध्ये अशा गोष्टी आहेत ज्या यशस्वी जीवन कसे जगायचे हे शिकवतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
आयष्यात जेव्हा सर्व नाती तुटू लागतात आणि पराभाव दिसू लागतो तेव्हा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले १० अमूल्य काय लक्षात ठेवा. त्यांचे हे वचन प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीत लक्षात ठेवले पाहिजेत. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
१- चाणक्य नीतीनुसार, सतत आणि नियमित प्रयत्नांनीच यश मिळू शकते. कठोर परिश्रम आणि समर्पण तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
२- ध्येय गाठण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी योग्य रणनीती आणि नियोजनावर भर दिला आहे. त्यांच्या मते, जो योजना आखत नाही, तो अपयशी ठरण्याची योजना आखतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
३- आचार्य चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने शिस्तबद्ध राहिले पाहिजे. शिस्त माणसाच्या आयुष्यात स्थिरता आणते. हे एखाद्या व्यक्तीला योग्य मार्गावर चालण्यास आणि त्याच्या कृतींमध्ये नियमितता राखण्यास मदत करते. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
४- आचार्य चाणक्य यांनीही माणसाच्या सर्वात मोठ्या आनंदाचे वर्णन केले आहे. त्यांच्या मते, ज्यांना तुम्ही प्रेम करता त्यांच्याबरोबर वेळ घालवणे हा सर्वात मोठा आनंद आहे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
५- सर्वात मोठी संपत्ती म्हणजे ज्ञान. आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्ञानाचा योग्य वापरच जीवनाला अर्थपूर्ण बनवतो. तुम्ही तुमचे ज्ञान नेहमी हुशारीने वापरावे आणि ते योग्य दिशेने वापरावे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
६- आचार्य चाणक्य यांच्या मते, सावध रहा आणि तुमच्या मित्रांचे आणि शत्रूंचे योग्य मूल्यांकन करा. स्वार्थी आणि कपटी लोकांपासून दूर राहा आणि कठीण काळात तुम्हाला साथ देणारे खरे मित्र शोधा. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
७- पैशांबाबत, चाणक्य नीतीमध्ये असे लिहिले आहे की ते केवळ आनंद आणि आरामासाठीच नाही तर वाईट काळात आधार देण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. पैसे साठवणे आवश्यक आहे, परंतु त्याचा योग्य वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
८- आचार्य चाणक्य म्हणतात की, तुमच्या कुटुंबाशी चांगले संबंध ठेवा आणि नीतिमत्तेचे पालन करा. कठीण काळात कुटुंबातील सदस्य सर्वात मोठा आधार देतात, म्हणून त्यांच्याशी सद्भावना ठेवा. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
९- चाणक्य नीतिमध्ये जीवनाचे मूलभूत कर्तव्य आणि धर्माचे पालन स्पष्ट केले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, योग्य काम करताना कधीही आपल्या कर्तव्यांपासून पळून जाऊ नये. अशा लोकांना समाजात आदर मिळतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
१०- आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा संकटाचा काळ येतो तेव्हा संयम आणि विवेकाने निर्णय घेतले पाहिजेत. प्रतिकूल परिस्थितीत, योग्य निर्णय आणि रणनीती वापरून एखाद्याची स्थिती सुधारता येते. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

“आम्ही मारवाडी आहोत, मराठीत का बोलू?”, पुणेरी ग्राहकानं दुकानदाराला दाखवला मराठी हिसका, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?