महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.
पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे. Read More
महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनामध्ये स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याने कामातील कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व निश्चित करणे सोपे झाले असल्याचे महापालिका आयुक्त…
अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबतचे सूत्र उभय राज्यांच्या जलसंपदा विभागाने निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आल्याचे अलमट्टी उंचीवाढ विरोधी कृती…
शहरात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आज, गुरुवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातील…
प्रस्तावित इमारत मैदानाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १५ टक्के भागावर उभारण्यात येणार असून, क्रीडा क्षेत्र सुरक्षित राहील, याची काळजी घेण्याचे नियोजन करण्यात…