महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.
पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे. Read More
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस पुणे, मुंबईसह राज्यभरात पावसाची शक्यता असून, २९ सप्टेंबरपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टीचा…
MPSC Refusal to Postpone Exam राज्यभर असलेल्या पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली असली तरी एमपीएससीने वेळापत्रक बदलण्यास…
बेरोजगारी, स्थलांतर आणि आरोग्य-रस्त्यांसारख्या सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष तसेच आरक्षणाच्या विषयामुळे खदखदत असलेल्या नंदुरबारमधील आदिवासी समाजाचा असंतोष जय वळवी या तरुणाच्या…
अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडसाद आज, गुरुवारी झालेल्या बँकेच्या अखेरच्या वार्षिक सभेत उमटले.त्यामुळे भाजपमधील गटबाजी…
अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सभेत सभासद शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली.…
भुईंज येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. देवी महालक्ष्मीच्या उत्सवमूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक घातला आणि हा सोहळा अनुभवणाऱ्या भाविक…