Maharashtra News Today, 31October 2023: मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं घर जमावाने पेटवून दिल्यानंतर यासंदर्भात राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अनेक ठिकाणी आमदार, मंत्र्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत उपोषण चालूच ठेवल्यामुळे राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
Maharashtra Political News in Marathi: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
उद्धव ठाकरे म्हणतात, “काही खासदारांनी राजीनामा देऊन काही होणार नाही. जेव्हा केव्हा केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होईल, तेव्हा पंतप्रधानांना सांगा की…”
मुंबई : वरळी कोळीवाड्यातील तीन मजली इमारत धोकादायक बनल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला आपला दवाखाना बंद करावा लागला होता. परिणामी, गेले तीन महिने वैद्यकीय उपचारांसाठी या परिसरातील रहिवाशांना दूरवर जावे लागत होते. मात्र महानगरपालिकेने वरळी कोळीवाड्यातच पुन्हा आपला दवाखाना सुरू केला असून आता सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत रहिवाशांना या दवाखान्यात आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.
पुणे : ससून रुग्णालयात सध्या केवळ एक कैदी रुग्ण उरला आहे. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललिल पाटील याने रुग्णालयातून पलायन केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. कैदी रुग्णांना तातडीने येरवडा कारागृहात पाठविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महिन्यात केवळ दोन कैदी रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनाही उपचार करून पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले.
पुणे : एखाद्या रेल्वे प्रवाशाला तातडीची वैद्यकीय मदत आता स्थानकातच उपलब्ध होणार आहे. यासाठी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला आहे. प्रवाशाची तब्येत बिघडल्यास या केंद्रात त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करून त्याला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
वर्धा: भारतीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविला जातो. यावर्षी आयोगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व पात्र विद्यार्थ्यांची शाळेतच मतदार म्हणून नोंदणी करण्याची विनंती शिक्षण विभागास केली होती.
प्रवाशांच्या मागणीचा विचार करून ठाणे महापालिका परिवहन विभागाने डोंंबिवलीतील बाजीप्रभू चौक ते दिवा पूर्व रेल्वे स्थानक बस सुरू केली आहे. आगासनमार्गे ही बस प्रवासी वाहतूक करत आहे. खासगी बस, रिक्षापेक्षा कमी दरात दिवा भागात पोहचता येत असल्याने या बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे १ ते ३ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
जरांगे पाटलांना माझी विनंती आहे, की कृपा करून तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका. तुमच्यासारख्या लढवय्यांची राज्याला आणि समाजाला गरज आहे. मराठा समाजातल्या तरुणांनाही मी विनंती करतो की कृपा करून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका – उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना अत्यंत स्पष्ट शब्दांत आदेश दिला आहे. काल संध्याकाळी माझ्या वाचनात आलं की नार्वेकर म्हणाले अजून मी तो आदेश वाचलेला नाही वगैरे. त्यामुळे जर नार्वेकर मुंबईत असतील, तर त्यांना ठाकरे गटाच्या नेत्यांनी निर्णयाची एक कॉपी द्यावी. त्यांच्यासमोरही एकदा या निर्णयाचं वाचन करावं – उद्धव ठाकरे
या आंदोलनांतर्गत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील लॅपटॉप, स्कॅनर व इतर सामग्री परत केली. त्यामुळे सात-बारा, आठ-अ आणि फेरफारचे दाखले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
लवाद सर्वोच्च न्यायालयाला न जुमानता आपल्या मस्तीने वागणार असतील, तर देशाचे जे हाल होतील ते कुणालाही सावरता येणार नाहीत – उद्धव ठाकरे
मी दसऱ्याच्या भाषणात बोललो होतो की अपात्रतेचा निर्णय आहेच. पण त्यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व आपल्या देशात काय असणार आहे, त्यावर आधारित देशाची घटना आणि लोकशाही टिकणार आहे की नाही हेही निर्णयावरून ठरणार आहे. भारतातली लोकशाही सर्वात मोठी आहे. ती धोक्यात येणार असेल, तर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. – उद्धव ठाकरे
साखळी उपोषणाला सरकार घाबरत नसतं. फक्त पाण्याला सरकार घाबरतं – मनोज जरांगे पाटील
काही वर्षांपूर्वी जवान मरत असताना पंतप्रधान वाईल्ड लाईफ शूटिंग करत होते. राज्य जळत असताना गृहमंत्री इतर राज्यात जाऊन निवडणूक पक्षाचा प्रचार झोडत आहे.. सर्वात अपयशी आणि नापास गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. – सुषमा अंधारे
https://twitter.com/andharesushama/status/1719228315041743191
गोंदिया: राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिधामध्ये यंदाच्या दिवाळीत पोहे व मैदा या दोन वस्तूंची भर घातली आहे.
गद्दारांच्या अपात्रतेची ‘तारीख’ ठरली! – ठाकरे गट
पिंपरी- चिंचवडमध्ये मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा दशक्रिया विधी करण्यात आला.
Apple फोन हॅक होऊ शकत नाही असं नेहमी म्हटलं जायचं. पण, Apple ने काही नेत्यांना ईमेलद्वारे कळवले आहे की, तुमचा Apple फोन हॅक केला गेला आहे आणि तसे त्यांनी State Sponsored आहे असे देखिल म्हटले आहे. म्हणजे आपण काय बोलतो काय ऐकतो. आपल्या फोनमध्ये कोणते फोटो आहेत याची माहिती सरकारला हवी आहे. महुआ मोइत्राच्या बाबतीत जे घडतयं ते हॅकींगमुळेच झालं हे आता स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी अजून कोण-कोणते उद्योग केले जातील हे देव जाणे. जगामध्ये हॅकींग हा सर्वात मोठा गुन्हा धरला जातो – जितेंद्र आव्हाड</p>
अकोला: मराठा आरक्षण मिळेपर्यंत मंत्र्यांनी जिल्ह्यात येऊ नये, यासह विविध मागण्यांचे निवेदन गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
पुणे : पावसाने ऑगस्ट महिन्यात दिलेली उघडीप, मोसमी आणि बिगरमोसमी पाऊस न झाल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादनात ३० टक्क्यांहून अधिक घट येण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उत्पादनात मोठी तूट येण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र समाधानकारक उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अकोला: क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यावर सट्टा लावण्यात येत असल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली.
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने पुढे सरकत असताना सिडकोने नवे विमानतळ-बेलापूर ते मानखुर्दपर्यंत नव्या मेट्रो मार्गिकेचा पुन्हा एकदा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर: ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीचा प्रत्यय जरीपटका रेल्वे उड्डाण पुलाच्या बाबतीत या परिसरातील सुमारे एक लाखांहून अधिक नागरिकांना येऊ लागला आहे. सत्ताधारी पक्षाने आपल्या नेत्याच्या फायद्यासाठी उड्डाण पुलाचा मूळ आराखडा बदलला.
राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा अधिक तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा यावेळी पठाण यांनी दिला.
नागपूर: कुऱ्हाडीने पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी हा निर्णय दिला आहे.
पिंपरी : शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्यामुळे गोशाळा असणे गरजेचे झाले आहे. शहरात ७०० मोकाट जनावरे असून यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली येथील सुमारे पाच एकर जागेत गो-संवर्धन केंद्र आणि गोशाळा सुरू करण्यात येणार आहे.
नागपूर: मराठा आरक्षणवरून राज्यात आंदोलन सुरू असताना मंगळवारी सकाळपासून उपराजधानी नागपुरात मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
नागपूर: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात घट होत असताना मुंबई तसेच कोकण विभागात कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ होत आहे. हे तापमान किमान पाच दिवस तरी असेच चढते राहील .
सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून त्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत. आम्ही माघार घेणार नाही – मनोज जरांगे पाटील
आमचे निम्मे लोक ओबीसी आरक्षणात आहेत. देशात व्यवसायाधारित आरक्षण आहे. आमचा व्यवसाय शेती आहे. आमच्या इतर लोकांना त्या आधारावर ओबीसी आरक्षण मिळालं आहे. मग आम्हाला का नाही? हा आमचा प्रश्न आहे. २००४ च्या जीआरमध्ये सुधारणा करून महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. कोणतीही शक्ती येऊ द्या, मराठे आता थांबणार नाही. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळेल. थोड्याच दिवसांत मिळेल – मनोज जरांगे पाटील
"..तर आंदोलन तीव्र होणार"; शिंदेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या घोषणेनंतर जरांगेंचं विधान
Maharashtra Political News in Marathi: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!