-
आज माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.
-
भालेराव यांनी आज भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे.
-
याशिवाय त्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
-
महायुतीमध्ये आपल्याला उदगीरमधून उमेदवारी मिळणार नसल्याचे निश्चित झाल्यांनतर भालेराव यांनी हा निर्णय घेतला असल्यचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपाला सोडचिठ्ठी देताना “भाजपातील मित्रांना भेटण्यासाठी येत राहील” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
-
सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून भाजपाचे दोन वेळा आमदार होते.
-
दरम्यान, सुधाकर भालेराव यांचा प्रवेश करून घेताना शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
“आगामी विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडी २२५ जागांवर विजयी होईल”, असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
-
“महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादीला बळ दिले पाहिजे, असे सगळ्यांच्या मनात आहे, जनतेचा घात केलेल्यांना धडा शिकवला पाहिजे”, असेही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.
-
महाविकास आघाडीत उदगीरची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीर मध्ये अजित पवार गटाचे संजय बनसोडे व शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांच्यात चांगलाच संघर्ष होईल अशी चिन्हे आहेत.
-
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीर मध्ये अजित पवार गटाचे संजय बनसोडे व शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांच्यात काट्याचा मुकाबला होईल अशी चिन्हे दिसत आहेत. हेही पाहा- PHOTOS : भारताची किती जनता ‘लोकशाही’ व्यवस्थेवर समाधानी? ; युरोप, अमेरिकेसह इतर देशांची काय

Vaishnavi Hagawane Case: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक