महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अष्टविनायक यात्रा फार प्रसिद्ध आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि दहा-अकरा दिवसांनंतर बाप्पा अनंत चतुर्दशी रोजी आपल्या गावी जायला निघतो. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये भक्तजण रमून गणेशाचे सेवा, आराधना करतात. दीड, पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक गणपती दहाव्या-अकराव्या दिवशी विसर्जित केले जातात. गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबई पाहण्यासारखी असते. रस्त्यांवर दुतर्फा गर्दी असते.
पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लोक येत असतात. महाराष्ट्रभर ही धूम पाहायला मिळते. कोकणामध्ये (Konkan) पारंपारिकरित्या नदीमध्ये विर्सजन केले जाते. या वर्षी बाप्पा १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार असून २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. Read More
विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर सुन्न झाल्यासारखे वाटत होते, अशा तक्रारी प्रत्यक्ष बंदोबस्तात सहभागी झालेले वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना…
तळजाई वसाहतीमध्ये दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी दुपारी हाणामारी झाली. हाणामारीत दहाजण जखमी झाले असून, याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा…