scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
anna dange bjp sangli
अण्णा डांगे स्वगृही परतणार

राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचे म्हणजेच भाजप शिवसेना युतीचे सरकार अपक्षांच्या मदतीने सत्तेवर आले. या मंत्री मंडळात अण्णा डांगे…

माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (छायाचित्र दी इंडियन एक्स्प्रेस)
मंत्री म्हणून लोकप्रिय झाल्याने अभिनेत्री स्मृती विस्मृतीत; काय म्हणाल्या माजी खासदार?

Smriti Irani interview : “माझं राजकीय आणि अभिनयाचं आयुष्य एकमेकांपासून खूप दूर होतं… आता मात्र ही दोन्ही विश्वं एकत्र येत…

Deputy Chief Minister Ajit Pawars reaction to Rohit Pawars viral video
Ajit Pawar: रोहित पवारांच्या व्हायरल व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Ajit Pawar: काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रोहित पवार हे पोलिसांवर…

rss to build hindu value based society by centenary year launches gharsamvad for social change pune
जागतिक शांतीसाठी ‘हिंदू प्रारूप’ विकसित करणार, रा. स्व. संघाच्या प्रांतिक समन्वय बैठकीत शताब्दी वर्षाचे नियोजन

संघाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व अधोरेखित करताना ढोले म्हणाले, ‘वैश्विक पटलावर भारताला विकसित आणि मार्गदर्शक बनायचे असेल, तर हिंदू मूल्याधिष्ठित समाज…

sunil tatkare about mahayuti strategy for local body elections Dhananjay munde position remains intact in ncp
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘महायुती’तून सामोरे जाणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी…

bjp leader pravin darekar got trapped in elevator for 20 minutes during bjp event in vasai
आमदार प्रवीण दरेकर पुन्हा लिफ्ट मध्ये अडकले; २० मिनिटांनी झाली सुटका

लिफ्टची आणि माझी जुनी दुश्मनी असल्याचे ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी भिवंडी येथे पक्षाचे शिबिर होते. तेव्हा अर्धातास अडकले होते.

eknath shinde slams uddhav Thackeray over party defections uses nero analogy criticize in thane event
पक्षातील लोक सोडून जाताना, नेता आनंद व्यक्त करतो; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

रोम जळत असताना, नीरो फिडल वाजवित होता अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

BJP drug dealer wing to hold service week statewide from tuesday for Devendra Fadnavis birthday
मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त भाजप औषध विक्रेता विभागातर्फे राज्यभर सेवा सप्ताह

भाजपच्या औषध विक्रेता विभागातर्फे येत्या मंगळवारपासून राज्यभर सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने राज्यभर विविध भागात सेवाभावी उपक्रम…

_INDIA bloc lines up issues to target Govt projects unity
INDIA आघाडीच्या बैठकीत मोदी सरकार विरोधात रणनीती ठरली? सर्वपक्षीय बैठकीत नक्की काय चर्चा झाली?

India Alliance meeting सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली.

Political rivalry likely to surface in municipal elections too
महापालिका निवडणुकीतही राजकीय सूडभावना उफाळण्याची शक्यता

विधानभवन परिसरातील हाणामारीच्या घटनेला राजकीय वैर भावनेची किनार असल्याने असे प्रसंग वारंवार घडण्याची शक्यता…

Gulabrao Deokar meets Suresh Jain sparking political talks in Jalgaon
जळगावच्या राजकारणात मोठी घडामोड… सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांची भेट

सर्व घडामोडी लक्षात घेता जळगावच्या राजकारणावर सुरेश जैन यांचा प्रभाव कायम असल्याची प्रचिती

Nagpurs development faces questions amid floods and poor sanitation despite BJP leadership
मुख्यमंत्रीही आपलेच, केंद्रीय मंत्रीही आपलेच.. तरीही नागपूर महापालिका देवाच्या भरवश्यावर..

नुकताच जाहीर झालेला स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल पाहता हे खरोखरंच विकासाचे शहर आहे का, हा प्रश्न…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या