scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
navi mumbai municipal politics controversy between eknath shinde ganesh naik factions over ward delimitation
शहरबात : राजकीय प्रभागचोरीची गुपचिळी

‘राज्यात सत्ता आमची, मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा आणि आमच्यावरच ही वेळ यावी’ या विचाराने भाजपची स्थानिक नेतेमंडळी चक्रावून गेली आहेत.

Hadapsar assembly constituency Ward composition BJP creates dilemma for opposition as well as allies pune print news
Municipal elections 2025 :भाजपकडून विरोधकांसह मित्रपक्षांचीही कोंडी

हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची रचना करताना खडकवासला, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पुरंदरसह वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील काही भागांचा समावेश करून भारतीय…

भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (फोटो सौजन्य पीटीआय)
Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांनी ‘या’ नेत्याच्या घरी राहण्याचा घेतला निर्णय; कारण काय?

Jagdeep Dhankhar Latest News : राजीनाम्याच्या एका महिन्यानंतर जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP Shinde Sena set for direct clash in sangali municipal elections Mahayuti unity maharashtra
सांगलीत नगरपालिकांसाठीही राजकीय मोर्चेबांधणी

स्थानिक पातळीवर राजकीय अस्तित्वासाठी युती, आघाडीला वळचणीला टांगून राजकीय घोडे दामटण्याचा प्रयत्न होणार हे निश्‍चित.

What did Supriya Sule say after meeting Manoj Jarange
Supriya Sule in Pune: जरांगेंना भेटल्यानंतर काय घडलं? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी आझाद मैदानात मनोज जरांगेंची भेट घेतली. ही भेट घेऊ परतताना…

vikram pawaskar announces three free welfare schemes in karad including health cards and mobile clinic
कराड : ‘लाडकी आई-ताई’, ‘आजी-आजोबा’आणि फिरता दवाखाना; विनायक पावसकरांच्या कार्याला सलाम म्हणून मोफत योजना

लाडकी आई-ताई योजनेत १५ वर्षांवरील महिलांना ‘सिंदूर हेल्थ कार्ड’ देवून त्यातून त्यांना आरोग्य तपासणी, पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिवाळी साहित्याचा…

Ashok Chavan stays away from Maratha reservation protests remains inactive in BJP amid Maratha quota agitation
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात उपरे!

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अशोक चव्हाणांकडे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद दिले होते.

Maharashtra Politics Live News Updates
औद्योगिक वसाहतीच्या भूखंडावरून कोल्हापुरात महायुतीत वादाची ठिणगी

कोल्हापुरातील महिला सक्षमीकरणाचा मैलाचा दगड ठरणाऱ्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहतीच्या मलईदार भूखंडावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shindes counterattack on Raj Thackerays statement
Eknath Shinde on Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वक्तव्यावर, एकनाथ शिंदेंचा पलटवार

हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज…

monoj jarange and CM devendra fadnavis
Devendra Fadnavis : “जरांगेंचे आंदोलन मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी, आरक्षणाची मागणी मान्य होणे अशक्य!” भाजपचे ओबीसी आमदार एकत्र येत…

मनोज जरांगे वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत आहेत. पूर्व विदर्भातील भाजपच्या आमदारांनी एकत्र येत जरांगे यांच्यावर विविध आरोप…

Kishor Tiwari and Nitin Gadkari
नितीन गडकरींविरुद्ध ‘डिसेंबर २०१२’ची पुनरावृत्ती? शेतकरी नेते किशोर तिवारींचे गंभीर आरोप…

भाजपच्या एका गटाने पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात ‘डिसेंबर २०१२’ सारखेच बदनामीचे षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे,…

संबंधित बातम्या