-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
-
आता ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात एक विधान केलं असून त्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्यात.
-
ममता यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘आरएसएस (ही संस्था) एवढीही वाईट नाही’ असं म्हटलं आहे.
-
भाजपाच्या कट्टर विरोधक असणाऱ्या ममता यांनी भाजपाची मातृक संस्था असणाऱ्या संघाचं कौतुक केल्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
-
विरोधी पक्षाकडूनही ममतांचा हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.
-
विशेष म्हणजे याच व्हिडीओत त्यांनी थेट राजकारण सोडण्यासंदर्भातील विधान केलं आहे. त्यातही त्यांनी हे भाजपाच्या संदर्भातून केलं आहे.
-
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल सरकारच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना दिसत आहेत.
-
एका टेबल समोर त्या बसल्या असून मागे राज्य सरकारचं चिन्ह आणि भारताचे राष्ट्रीय ध्वज दिसत आहेत. बोलताना ममता या आरएसएसचा उल्लेख करतात.
-
या व्हिडीओमध्ये त्या, “आरएसएस एवढी वाईट नाही. आजही संघामध्ये असे काही लोक आहेत जे भाजपाप्रमाणे विचार करत नाहीत,” असं म्हणताना ऐकू येत आहे.
-
याच व्हिडीओमध्ये पुढे ममता बॅनर्जी भाजपावर टीका करताना दिसत आहेत.
-
तृणमूल काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे.
-
मात्र आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
-
आपल्याला व आपल्या कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही ममता यांनी केला आहे.
-
केंद्र सरकार आपल्या कुटुंबाविरोधात कट रचत असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे.
-
“माझ्या कुटुंबियांपैकी कोणालाही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणांकडून नोटीस मिळाली तर त्याला मी कायदेशीर मार्गाने उत्तर देईन,” असं दोन दिवसांपूर्वीच ममता यांनी म्हटलं होतं.
-
सक्तवसुली संचलनालयाने कोळसा तस्करी प्रकरणामध्ये सुरु असणाऱ्या तपासादरम्यान ममतांचे भाचे आणि तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रीय तपास यंत्रणांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिल्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी हे विधान केलं आहे.
-
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक हे ममतांनंतरचे नंबर दोनचे महत्त्वाचे नेते आहेत.
-
भाजपा घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करत ममता यांनी एक मोठं विधान केलं आहे.
-
तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, असा आरोप ममतांनी केला आहे.
-
केवळ सूड उगवण्याच्या दृष्टीने राजकारण होत आहे असं नाही तर ही एक प्रकारची हिंसाच आहे, असंही ममता यांनी म्हटलं आहे.
