scorecardresearch

विनायक परब

गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.

‘लाइफ’चा अभाव; फक्त ‘स्टाइल’!

चांगल्याची आस प्रत्येकालाच असते. चांगलंचुंगलं जे आहे, ते सगळं शहरांमध्ये असा एक समज आपल्याकडच्या गावखेडय़ांमध्ये आहे, तर हट्टाकट्टा समाज पाहायचा…

वेसण!

गूगल, फेसबुक या दोन्ही कंपन्या आता एवढय़ा बलाढय़ झाल्या आहेत की, त्यांनी अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले आहे.

अनर्थाला आवताण!

माणसाने धरबंद सोडला किंवा माणूस बेशिस्त झाला म्हणून निसर्ग बेशिस्त वागत नाही. तो वेळोवेळी इशारे देत असतो.

स्वयंचीत!

प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चाच्या निमित्ताने घातलेला धुडगूस त्यांच्याकडून जनतेची सहानुभूती हिरावून घेणारा ठरला आहे.

चतुर चाल

पश्चिम बंगालला आता युद्धभूमीचे स्वरूप आले असून येत्या तीन महिन्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांपर्यंत तापमान चढेच राहणार आहे.

मुस्कटदाबी

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या गोपनीयता धोरणामध्ये वापरकर्त्यांना त्यांचा डेटा फेसबुक किंवा इतर कोणत्याही त्रयस्थ यंत्रणेला वापर करू देण्यास अटकाव करण्याची कोणतीही सोय…

चेहऱ्याची अडचण!

खरे तर नववर्षांला सुरुवात होण्याआधीच पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांचा डंका वाजण्यास सुरुवात झाली होती

लोकसत्ता विशेष