* चॅम्पियन्स करंडक मालिकेत १५ जून रोजी दोन्ही संघ आमने-सामने
पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज सईद अजमलने आगामी चॅम्पियन्स करंडक सामन्यांमध्ये भारताविरुद्धचा सामना खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. तसेच चॅम्पियन्स करंडक मालिकेत भारत विरुद्ध पाकिस्तान होणारा सामना हा इतका महत्त्वाचा असेल की, अंतिम सामन्यासारखेच त्याला महत्व प्राप्त करेल असेही सईद म्हणाला.
सहा जून पासून सुरू होणा-या चॅम्पियन्स करंडक सामन्यांमध्ये १५ जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारताविरुद्धचा सामना नेहमी रोमांचक होत असल्याचेही सईद म्हणाला.
” आमचा सामना कुठेही होवो, तिथे वातावरण नेहमी उत्कृष्ट असते आणि मला विश्वास आहे की, एजबेस्टन येथील प्रेक्षक तसेच दुरदर्शवरून सामना पाहणारे क्रिकेटरसिक या सामना पाहताना त्यांची निराशा होणार नाही. हा सामना या करंडक स्पर्धेतील मिनी-फायनल सारखाच असेल” असेही सईद अजमल म्हणाला.