जगात असे अनेकजण असतात ज्यांना इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करायचे असते. आपल्या कृतीतून ते जगाला दाखवायचे असते. सिनेमा हे असे माध्यम आहे ज्या मार्फत आपण आपला संदेश अनेकांपर्यंत पोहोचवू शकतो. डोक्यातले विचार कागदावर उतरतातही. पण ते प्रत्यक्ष सिनेमात उतरतातच असे नाही. आदिश केळुसकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कौल’ हा सिनेमाही तुम्हाला याचीच जाणीव करुन देईल.

सिनेमाची कथा कोकणात घडताना दिसते. मुंबईत नायकाच्या हातून अशी काही घटना घडते ज्यामुळे तो कोकणात येतो. कोकणात आल्यानंतर एका शाळेत शिक्षक म्हणून रुजूही होतो. त्याच्यासोबत तिथेही असे काही घडते ज्याच्यावर त्याचा विश्वास तर नसतो पण त्याच्या मनातले विचार त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. आपल्या विचारांपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असताना तो कसा त्यात अधिक गुंतत जातो आणि शेवटी त्याच्या हाती काय येते या सगळ्याचा घेतलेला मागोवा म्हणजे कौल. आपल्या अस्तित्वाचा शोध घेताना नायकाची म्हणजे अभिनेता रोहीत कोकाटे याची धडपड यात दाखवण्यात आली आहे.

aai kuthe kay karte fame Radhika Deshpande shared review of Swargandharva Sudhir Phadke movie
“समुद्राच्या खोल गहिऱ्या तळाशी घेऊन जाणारा प्रवास”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचं केलं कौतुक
prajakta mali Jewellery brand first partnership with naach ga ghuma movie
प्राजक्ता माळीचं ‘नाच गं घुमा’ चित्रपटाशी आहे खास कनेक्शन! पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली, “माझी पहिली पार्टनरशिप…”
Jawan director atlee failed ranveer singh with his super dancing skills
Video: रणवीर सिंहपेक्षा जबरदस्त डान्स करतो ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली, पाहा व्हिडीओ
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित

दुसऱ्यांपेक्षा वेगळे काही देण्याच्या अट्टाहासात दिग्दर्शकाच्या हातून खूप काही निसटल्यासारखे हा सिनेमा बघताना सतत जाणवते. अनेक गोष्टींमध्ये त्रुटी जाणवून येतात. सिनेमाचे संकलन अधिक चांगल्याप्रकारे करता येऊ शकले असते. सतत तिच दृष्ये दिसत राहिल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा सिनेमा कंटाळवाणा वाटू शकतो. जस जसे कथानक पुढे जाते ते पहिल्या धाग्याला सोडून दुसऱ्या गोष्टीमध्ये अडकत जाते. त्यामुळे नक्की काय धरावे आणि काय सोडावे हेच शेवटपर्यंत कळत नाही. कथानकामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात.

नायक आपल्या विचारांचा, अस्तित्वाचा शोध घेत असतो. बऱ्याचदा स्वत:चा आणि अस्तित्वाचा शोध घेताना, हिंसा अपरिहार्य होऊन बसते! ‘कौल’ सिनेमा नेमकी यावरच भाष्य करतो. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जेवढा संभ्रम त्या नायकाच्या डोक्यात चाललेला असतो. तेवढाच किंबहूना त्याहून जास्त संभ्रम हा प्रेक्षकांच्या डोक्यातही सुरु होईल.
पुरस्कारांनी नावाजलेले सिनेमे सर्वसामान्यांना प्रत्येकवेळी पटतातच असे नाही. अशा धाटणीच्या सिनेमांसाठी अजून तसा भारतीय प्रेक्षक तयार व्हायचा आहे. असे असूनही दिग्दर्शकाच्या या धाडसी प्रयत्नाला दाद द्यावी लागेल.

– मधुरा नेरुरकर