बँकिंग नियामक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज ९० वर्षांची झाली आहे. रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी ९० रुपयांचे नाणे जारी केले. देशात प्रथमच ९० रुपयांचे नाणे जारी करण्यात आले असून, नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. ९० रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला ९० रुपये असे लिहिलेले आहे. तसेच त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेले आहे. नाण्याच्या एका बाजूला जिथे RBI लिहिलेले आहे, त्याच्या वरच्या भागात हिंदी तर खालच्या भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे. याशिवाय लोगोच्या खाली @९० चा उल्लेख आहे. हे नाणे सामान्य नाण्यांप्रमाणे खरेदी-विक्रीसाठी वापरले जाणार नाही.

नाण्याचे वजन ४० ग्रॅम

नाण्याचे वजन ४० ग्रॅम आहे. जे ९९.९ टक्के शुद्ध चांदीपासून तयार केलेले आहे. संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त ७५ रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते, तर पंतप्रधानांच्या ‘मन की बात’च्या १०० व्या पर्वाच्या निमित्ताने १०० रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते.

हेही वाचाः “चिप उत्पादकांना अनुदान देण्यापेक्षा…”, रघुराम राजन यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “इथे रोजगार मोठं आव्हान असताना…”

नाणे कोणत्या किमतीला विकले जाणार?

९० रुपयांचे हे नाणे लाँच केल्यानंतर दर्शनी मूल्यापेक्षा अधिक किमतीवर विकले जाणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, या नाण्याची अंदाजे किंमत ५२०० ते ५५०० रुपये असण्याची शक्यता आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसह नाणे संग्राहकांमध्ये या नाण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. १९ मार्च २०२४ ला आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय आणि भारत सरकार यांनी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना देखील जारी केली होती.

हेही वाचाः Gold-Silver Price on 1 April 2024: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात तेजी, वाचा आजचे दर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरबीआयच्या कामाचे केले कौतुक

आरबीआयच्या ९० वर्षांच्या कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआयची भूमिका खूप महत्त्वाची आणि मोठी आहे. आरबीआय जे काही काम करते, त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांवर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर होत असतो. तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

RBI चा इतिहास स्वातंत्र्यापेक्षा जुना

जर आपण केंद्रीय बँक असलेल्या RBI चा इतिहास पाहिला तर तो स्वातंत्र्यापेक्षा जुना आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले, तर RBI ची १ एप्रिल १९३४ रोजी स्थापन झाली. RBI अस्तित्वात येण्यापूर्वी भारताची चलन व्यवस्था ब्रिटनमधून व्यवस्थापित केली जात होती.

रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, तेव्हा तिचे मुख्यालय कोलकाता येथे होते, परंतु आता केवळ चार वर्षांनी ते मुंबईला हलवण्यात आले आहे. RBI च्या ९ दशकांच्या दीर्घ इतिहासात एकूण २६ गव्हर्नर झाले आहेत. सध्या RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत, जे ऑक्टोबर २०२१ पासून या पदावर आहेत. सर ओसबोर्न अर्केल स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते आणि त्यांनी १ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७ या काळात या पदावर राहून काम पाहिले होते.