सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महासागराच्या भरती-ओहोटीबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारतीय उपखंडाची निर्मिती आणि भारताच्या भौगोलिक रचनेविषयी जाणून घेऊ. पृथ्वीविषयक शास्त्रज्ञांनी काही पुराव्यांवर आधारित काही सिद्धांतांच्या मदतीने भौतिक वैशिष्ट्यांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकीच एक प्रशंसनीय सिद्धांत म्हणजे ‘प्लेट टेक्टोनिक्सचा सिद्धांत’. या सिद्धांतानुसार पृथ्वीचे कवच (वरचा भाग/शिलावरण/Lithosphere) सात प्रमुख व काही लहान प्लेट्समधून तयार झाले आहे.

या प्लेट हालचाली तीन प्रकारांमध्ये वर्गीकृत केल्या गेल्या आहेत. काही प्लेट्स एकमेकांच्या दिशेने येऊन अभिसरण सीमा तयार करतात; तर काही प्लेट्स एकमेकांपासून दूर जाऊन भिन्न सीमा तयार करतात. दोन प्लेट्स एकत्र आल्यास, त्या एक तर आदळू शकतात आणि चुरा होऊ शकतात किंवा एक दुसऱ्याच्या खाली सरकतात. अशा प्रकारच्या प्लेट्सच्या हालचालींमुळे प्लेट्स आणि वरील खंडीय खडकांमध्ये तणाव निर्माण होतो; ज्यामुळे खडकांचे दुमडणे आणि ज्वालामुखीय क्रियाकलाप होतात. त्यामुळे खडकांच्या रचना बदलतात आणि अनेक भौगोलिक पृष्ठभागांची निर्मिती होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : बुद्धिवंतांचे स्थलांतर म्हणजे काय? त्याचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिणाम कोणते?

भारत हा विविध भूवैज्ञानिक कालखंडांत निर्माण झालेला एक मोठा भूभाग आहे. भूगर्भीय निर्मितीव्यतिरिक्त, अनेक प्रक्रिया जसे की हवामान, अपक्षरण (इरोशन) व संचयन (डिपॉझिशन) यांमुळे भारताच्या भौगोलिक व भूगर्भीय रचनेची निर्मिती होण्यास मदत झाली आहे. अशा हालचालींचा भारताच्या सध्याच्या भूस्वरूप वैशिष्ट्यांच्या उत्क्रांतीवरही परिणाम झाला आहे.

पृथ्वीवर सर्वांत पहिला पंजीया नावाचा महाखंड अस्तित्वात होता. त्याचे दोन भागांत विभाजन होऊन, उत्तरेकडील अंगारा किंवा लोरेशिया; तर दक्षिणेकडील गोंडवाना असे दोन भूभाग तयार झाले. साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवाना भूमीचा भारत एक भाग होता. गोंडवाना भूमीत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. संवहन प्रवाहांमुळे (Transition force) हा भाग अनेक तुकड्यांमध्ये विभाजित झाला आणि त्यापैकी इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट (भारत) गोंडवाना भूमीपासून विभक्त झाल्यानंतर ५०° दक्षिण अक्षांशपासून पुढे नैर्ऋत्य दिशेने वाहत गेली.

या उत्तरेकडील प्रवाहामुळे साधारणपणे पाच कोटी वर्षांपूर्वी या प्लेटची खूप मोठ्या युरेशियन प्लेटशी टक्कर झाली. या टकरींमुळे टेथिस नावाने ओळखल्या जाणार्‍या भू-सिंकलाइनमध्ये (Geo Syncline) जमा झालेले गाळाचे खडक दुमडून पश्चिम आशिया आणि हिमालयातील पर्वतीय प्रणाली तयार झाली. टेथिस समुद्रातून हिमालयातील उत्थान आणि प्रायद्वीप पठाराच्या उत्तरेकडील बाजू खाली गेल्यामुळे मोठ्या खोऱ्याची निर्मिती झाली. कालांतराने ही दरी उत्तरेकडील पर्वतरांगांतून वाहणाऱ्या नद्या आणि दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठारांद्वारे गाळाच्या साचण्याने भरून निघाली. विस्तीर्ण जलोढ ठेवींच्या सपाट जमिनीमुळे भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांची निर्मिती झाली.

भौगोलिकदृष्ट्या द्वीपकल्पीय पठार हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्राचीन भूभागांपैकी एक आहे. तो सर्वांत स्थिर भूखंडांपैकी एक असावा, असे मानले जाते. कारण- हा भाग भूकंपप्रवण किंवा ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात मोडत नाही. हिमालय आणि उत्तरेकडील मैदाने ही सर्वांत अलीकडील भूस्वरूपे आहेत. भूगर्भशास्त्राच्या दृष्टिकोनातून हिमालय पर्वत एक अस्थिर क्षेत्र बनवतात. हिमालयाची संपूर्ण पर्वतप्रणाली उंच शिखरे, खोल दऱ्या व वेगाने वाहणाऱ्या नद्यांसह अतिशय तरुण स्थलाकृतीचे प्रतिनिधित्व करते.

उत्तरेकडील मैदाने गाळापासून बनलेली आहेत. गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वतांची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वांत प्राचीन पर्वतांमध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. त्यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्य प्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूरचे पठार इत्यादी भूभाग येतो. दख्खनच्या पठाराला समुद्री किनाऱ्याला समांतर, असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार हे भारताच्या नैर्ऋत्य दिशेला असणाऱ्या प्रवासाच्या वेळी हरी युनियन बेटाजवळ तब्बल २९ वेळा ज्वालामुखीचे स्फोट होऊन त्यापासून निर्माण झाले. अशा प्रकारे भारताची भूमी उत्तम भौतिक भिन्नता दर्शवते.

भारताचे भौगोलिक स्थान :

कन्याकुमारी ते हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगांपर्यंत पसरलेला भारत हा भौगोलिकदृष्ट्या मोठा देश आहे. तो सर्वांत मोठा खंड आशिया खंडातील दक्षिण दिशेला स्थित आहे. उत्तरेकडे हिमालयाने उर्वरित आशियाच्या भागांपासून त्याला वेगळे केले आहे. वर्तमान स्थितीत भारत उत्तर पूर्व गोलार्धात आशियाच्या मध्यभागी वसलेला आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४’ उत्तर अक्षांश ते ३७°६’ उत्तर अक्षांश असून, रेखावृत्तीय विस्तार ६८°७’ पूर्व रेखांश ते ९७°२५’ पूर्व रेखांश आहे. भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. आहे; जे जागतिक क्षेत्रफळाच्या २.४२% आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील स्थलांतर भाग-२ : स्थलांतराच्या कारणानुसार स्थलांतरीतांचे स्वरूप

भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) इतका समुद्रकिनारा लाभला आहे. त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे; तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्वीपसमूहांमध्ये समाविष्ट आहे. भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्य भूमीमधील समुद्रकिनाऱ्यांमध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहेत आणि ११ टक्के खडकाळ; तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला प्रदेश आहे. अशा प्रकारे भारताची निर्मिती झाली असून, ते सध्याचे भौगोलिक स्थान आहे.

भारत देशाचे नामकरण

या प्रदेशाला भारत, हिंदुस्थान आर्यावर्त अशी विविध नावे देण्यात आली आहेत. भारत या शब्दाचा उगम ग्रीक साहित्यात आहे; ज्याचा अर्थ ‘इंडोई’ची भूमी, इंडोसजवळ राहणारे लोक (लॅटिन इंडस). पर्शियन व ग्रीक लोकांनी सिंधू नदी हे नाव ‘हिंदोस’वरून ठेवले. त्यामुळे याला पर्शियन आणि इतर पश्चिम आशियाई भाषांमध्ये हिंदुस्थान- हिंदूंची भूमी, असे म्हटले गेले. हिंदू हा शब्द सिंधूपासून आला आहे. पर्शियन लोक ‘स’चा उच्चार ‘एच’ करतात आणि म्हणून ते सिंधूला हिंदू म्हणतात. सिंधूच्या पूर्वेकडील भूमीला हिंदुस्थान, असे म्हणतात.

हिंदू साहित्यात संपूर्ण उपखंडाला भारत किंवा भारतवर्ष अशी शैली दिली गेली आहे; ज्याने देशाच्या मूलभूत एकतेची कल्पना केली होती. तथापि, काही विद्वानांचा असा विश्वास आहे की, हे नाव भरत जमातीवरून आले आहे; ज्यांनी या भागात वास्तव्य केले होते. युरोपियन भाषांमध्ये ते भारत या नावाने प्रसिद्ध आहे. आर्यावर्त हे नाव आर्य वंशाच्या भूमीला सूचित करते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography formation of indian penninsula geographical location of india mpup spb