पाकिस्तानमध्ये काश्मीरमधील उरी येथे करण्यात आला तसा हल्ला करावा, असे वक्तव्य भाजप खासदार व माजी गृहसचिव आर. के. सिंह यांनी केले.

ते म्हणाले, की पाकिस्तानने दहशतवादाचा वापर भारताविरोधात धोरण म्हणून केला आहे. पाकिस्तान अशी कृत्ये आगामी काळातही करीत राहील. आपण प्रतिहल्ला केल्याशिवाय व त्यांना जखमा दिल्याशिवाय हे थांबणार नाही.

अगदी व्यक्तिगत पातळीवर उतरून आपण हल्ला केला तरच पाकिस्तान वठणीवर येईल.

काश्मीरमध्ये उरी येथे लष्कराच्या हवाईतळावर करण्यात आलेल्या हल्ल्यात १८ सैनिक शहीद झाले, तर सीमेपलीकडून आलेले चार दहशतवादी मारले गेले होते. आर. के. सिंह हे बिहारचे खासदार असून, त्यांनी या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हे वक्तव्य केले आहे.