नवीन वर्षाच्या दिवशी गलवान खोऱ्यात चीनचा ध्वज फडकवल्याच्या दाव्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी पूर्णविराम दिला. काही दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी या प्रदेशात त्यांचा ध्वज प्रदर्शित केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता त्याच ठिकाणी उभं राहून भारतीय जवानांनी तिथं तिरंगा फडकवला आहे. त्यामुळे आता चीनचे दावे फोल ठरले आहेत.

तत्पूर्वी, मीडियाने वृत्त दिले की चीन सरकारने नवीन सीमा कायदा लागू करण्याच्या दोन दिवस अगोदर आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांचे नामांतर करण्याचा प्रयत्न केला होता. भारत सरकारने गेल्या गुरुवारी सांगितले की, चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे स्वतःच्या भाषेत बदलण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत आणि असे ठामपणे सांगितले आहे की सीमावर्ती राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील आणि नवी नावं दिल्यानं वस्तुस्थिती बदलत नाही.

Why has the government banned 23 dangerous dogs in the country
पिटबुल, रोटवायलर, अमेरिकन बुलडॉग… देशात २३ ‘धोकादायक’ श्वानांवर सरकारकडून बंदी का? श्वानप्रेमींचे बंदीविरुद्ध आक्षेप कोणते?
joi biden
अन्वयार्थ: बायडेन प्रशासनाचा नैतिक विजय..
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची स्वतःच्या भाषेत नावे बदलल्याच्या वृत्तावरील माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की चीनने एप्रिल २०१७ मध्ये अशी नावे देण्याचा प्रयत्न केला होता. २०२० मधील गलवान चकमकीनंतर, लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्या ठप्प झाल्या आहेत.

कडाक्याच्या हिवाळ्यातही पूर्व लडाखच्या प्रत्येक बाजूला सैन्याची मोठी उभारणी हे सूचित करते की संघर्ष कमी होण्याची शक्यता नाही. भारताने असे म्हटले आहे की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) स्थिती चीनच्या बाजूने स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे आणि द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केल्यामुळे उद्भवली आहे.